AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंजूर कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ, कोल्हापुरात तरुणाची आत्महत्या

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मंजूर कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने तरुणाने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. 20 ऑगस्टला जयने विष प्राशन केले होते, तर 23 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला

मंजूर कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ, कोल्हापुरात तरुणाची आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 4:00 PM
Share

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मंजूर कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने कोल्हापुरातील तरुणाने आयुष्य संपवलं. तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांसह बँक निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

कर्ज मंजूर होऊनही रक्कम मिळत नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मंजूर कर्जाची रक्कम देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने तरुणाने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

विष प्यायल्यानंतर तीन दिवसांनी मृत्यू

जय डवंग असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. 20 ऑगस्टला जयने विष प्राशन केले होते, तर 23 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. आत्महत्या प्रकरणी बँक निरीक्षक राजेंद्र बेलेकर आणि शाखा अधिकारी नामदेव खोत यांच्यावर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा आरक्षण नसल्याने जालन्यात तरुणाचा गळफास

दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षण नसल्यानं एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडलीये.

सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

सदाशिव शिवाजी भुंबर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो 22 वर्षांचा होता. ‘आरक्षण नसल्याने जीवनयात्रा संपवतोय’, अशी सुसाईड नोट लिहून त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला.

सदाशिव हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. त्याने इलेक्ट्रीशियनचा कोर्स केला होता. मात्र मराठा आरक्षण नसल्यानं पाहिजे तशी नोकरी मिळत नव्हती, असा त्याचा आरोप होता. शिवाय शेतात ओला दुष्काळही आहे आणि याच विंवचनेत सदाशिवनं घरातील छताच्या पंख्याला मंगळवारी रात्री गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

येणोरा गावातील तरुणांची मागणी

आत्महत्या करण्यापूर्वी सदाशिवनं एक सुसाईड नोटही लिहून ठेवली. यामध्ये त्याने ओला दुष्काळ आणि मराठा आरक्षण नसल्याने आत्महत्या करीत आहे, असं स्पष्ट उल्लेख केला आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आपले प्राण दिले आहेत. महिना-दोन महिन्यांनी अशी बातमी राज्यातून येताना दिसतात. त्यापेक्षा एकदाच आरक्षणाचा निकाल लावून टाका, अशी मागणी येणोरा गावातील मराठा तरुणांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

‘आरक्षण नाही, जीवनयात्रा संपवतोय’, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या

सावकारांच्या जाचाला कंटाळून दोघांची आत्महत्या, हातावर आरोपींच्या नावांचा उल्लेख, परभणीत खळबळ

हॉटेलमध्ये नवरा-बायको म्हणून मुक्काम, बॉयफ्रेण्डकडून चारित्र्यावर संशय, अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Follow Us
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.