AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोरी करून ते SORRY लिहून ठेवायचे, भुयार खणून सोन्याची दुकाने लुटायचे

चोरांना पकडण्यासाठी शंभराहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. मोबाईल संभाषण तपासले गेले, गुप्त माहिती आधारे अखेर त्यांना अटक करण्यात आली.

चोरी करून ते SORRY लिहून ठेवायचे, भुयार खणून सोन्याची दुकाने लुटायचे
meerutImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 07, 2023 | 8:25 PM
Share

लखनऊ : मेरठ शहरातील अनेक सराफांची सोने-चांदीची दुकाने फोडण्याच्या घटना गेल्या काही महिन्यात घडल्या होत्या. त्यापैकी चोरीच्या चार प्रकरणात चोरट्यांनी गेट तोडला नव्हता, शटर तोडले नव्हते किंवा भिंत ओलांडून प्रवेश केला नव्हता. तर या चोरट्यांनी चक्क भूयार खणून या चोऱ्यांना केल्या होत्या. आणि चोरी केल्यानंतर दुकानदाराला वाईट वाटू नये म्हणून ही चोर मंडळी सॉरी अशी सूचना मागे लिहून पळून जायचे. अशा चोरांपैकी तिघा जणांना अटक करण्यात यश आले आहे.

चोरांच्या एका गॅंगने मेरठ पोलिसांची झोप उडविली होती. ही गॅंग चोरी करायची तेही भुयार खणून, त्यामुळे मेरठ पोलिसांची नोकरीच धोक्यात आली होती. मेरठ पोलिसांनी या चोरांपैकी तिघांना अटक केली आहे. ही चोर मंडळी रात्री चोरी करुन दिवसा मजूरी करायचे. भुयार खणण्याची कला आपण युट्युबवर व्हिडीओ पाहून शिकल्याचे त्यांनी पोलिसांना चौकशीत सांगितले आहे.

मेरठमध्ये अनेक महिन्यांपासून चोरांनी उच्छाद मांडला होता. भुयारे खणून या चोऱ्या केल्या जात होत्या. 27 मार्च रोजी नौचंदी ठाणा क्षेत्रातील अंबिका ज्वेलर्समध्ये नाल्यावाटे चोरटे शिरले आणि त्यांनी दुकाने लुटले होते. त्यात 15 लाखाचा माल आणि सीसीटीव्ही-डीव्हीआर पळविला होता. चोरांनी SORRY अशी लेखी सूचना लिहून ठेवली होती. या घटनेनंतर मेरठ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर नौचंदी पोलिसांची बदल्या झाल्या होत्या. आणि एक वेगळे तपास पथक नेमले.

भाड्याने घर घेतले होते

चोरांना पकडण्यासाठी शंभराहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. मोबाईल संभाषण तपासले गेले, गुप्त माहिती आधारे बुलंदशहर येथून यामीन, शबीर आणि अमित या चोरट्यांना पकडण्यात यश आले. मेरठच्या एसएसपी रोहीत सिंह यांनी सांगितले की चोरट्यांनी मेरठच्या लिसाडी गेट येथे भाड्याने घर घेतले होते. रात्री चोरी करायचे आणि दिवसा ते मजूरी करायचे. जेथे जास्त सीसीटीव्ही नाहीत अशी दुकाने हेरून भुयार खणायचे. त्यांच्याकडून चांदी आणि दोन लाखाची रोकड सापडली आहे. तीन गुन्ह्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.

दोन रात्रीत भुयार खणायचे

या चोरट्यांकडे गॅस कटर पासून सर्व सामान होते. त्यांना एक भुयार खणायला दोन ते अडीच दिवस लागायचे. ज्या दिवशी दुकान बंद असेल त्या दिवशी त्या दिवशी ते लुटायचे. चोरी केल्यावर जास्त वाईट वाटू नये म्हणून ते सॉरी असे लिहून ठेवायचे असे चोरट्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.