AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मासिक पाळीचा भयंकर त्रास, इतक्या वेदना की तिने आयुष्यच संपवलं; मुंबईसारख्या बड्या शहरातील धक्कादायक घटना

मासिक पाळीचा त्रास प्रत्येक मुलीला, महिलेला सहन करावा लागतो. काहींना जास्त त्रास होतो तर काहींना कमी. पण थोड्याफार प्रमाणात सर्वच स्त्रियांना यातून जावं लागतं. त्यावर विविध उपायही केले जातात. मात्र मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने एका अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलत स्वत:चं आयुष्यच संपवल्याची धक्कादायक घटना घडली

मासिक पाळीचा भयंकर त्रास, इतक्या वेदना की तिने आयुष्यच संपवलं; मुंबईसारख्या बड्या शहरातील धक्कादायक घटना
| Updated on: Mar 28, 2024 | 12:10 PM
Share

मासिक पाळीचा त्रास प्रत्येक मुलीला, महिलेला सहन करावा लागतो. काहींना जास्त त्रास होतो तर काहींना कमी. पण थोड्याफार प्रमाणात सर्वच स्त्रियांना यातून जावं लागतं. त्यावर विविध उपायही केले जातात. मात्र मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने एका अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलत स्वत:चं आयुष्यच संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालाड परिसरात मंगळवारी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. घरात कोणीच नसताना तिने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. ती अवघ्या 14 वर्षाची होती. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी 14 वर्षांची होती, ती मालवणी येथील खारोडी परिसरात तिच्या आई-वडिलांसह रहात होती. तिला पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. मात्र त्या दरम्यान होणारा त्रास तिला सहन होत नव्हता. त्यामुळेच मानसिक नैराश्यातून तिने हे टोकाचं पाऊल उचललं. मंगळवारी संध्याकाळी तिने तिच्या राहत्या घरातील लोखंडी सळीला गळफास लावून स्वत:चं आयुष्य संपवून टाकलं. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं.

हा प्रकार तिच्या पालकांच्या लक्षात येताच त्यांनी हंबरडा फोडला. वेळ न घालवता त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बेशुद्ध मुलीला त्यांनी कांदिवलीतील जनकल्याणनगर, सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी संध्याकाळी 7.15 च्या सुमारास तिला मृत घोषित केले. ही माहिती मिळताच मालवणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी तिच्या पालकांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. या पाळीचा तिला प्रचंड त्रास होत होता ,त्यामुळे ती मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने हे पाऊल उचललल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.