AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त छोट्याशा रुमालाने दिसेल त्याला ढगात पोहोचवायचा, 900 मर्डर करून घाम फोडला; कोण आहे हा सीरिअल किलर?

ना बंदूक, चाकू, ना कोणतंही हत्यार... फक्त रुमालाने जागेवरच ठार करायचा, 900 लोकांची हत्या करणारा महाखतरनाक सीरिअल किलर माहीत आहे का?

फक्त छोट्याशा रुमालाने दिसेल त्याला ढगात पोहोचवायचा, 900 मर्डर करून घाम फोडला; कोण आहे हा सीरिअल किलर?
फाईल फोटो
| Updated on: Aug 14, 2025 | 11:47 AM
Share

Dangerous Serial Killer: कोयत्याने हत्या केली… चाकूने वार केले… गोळीबार केला… अशा अनेक धक्कायदायक घटना आपण ऐकत असतो, वाचत असतो. पण साध्या दिसणाऱ्या रुमालाने 900 पेक्षा अधिक लोकांचे प्राण घेणाऱ्या सिरियल किलरबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. आपण रुपाल साध्या कामासाठी वापरतो, पण या महाखतरनाक व्यक्तीने रुमालाचा उपयोग लोकांना जीवेमारण्यासाठी केला. तर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, हा सिरियल किलर कोण आहे, आणि आता काय करतो. सांगायचं झालं तर, भारताचा इतिहास फक्त सम्राट आणि संतांपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. भारतात असे अनेक कुख्यात गुंड होऊन गेले, ज्यांचं नाव ऐकलं तरी भीती वाटते.

18 आणि 19 व्या शतकादरम्यान, असंच एक नाव उदयास आलं ज्याने मृत्यूला आपला व्यवसाय बनवलं होतं. अनेकांचे प्राण त्याने घेतले. या महाभयंकर सिरियल किलरचं नाव होतं बेहराम… याचं नाव ऐकताच ब्रिटीश अधिकारी देखील थरथर कापत होते.

रुमालच खून करण्याचं हत्यार बनलं

बेहराम याची ओळख त्याच्या खास अंदाजात करुन दिली जात होती. बेहराम बंदूक किंवा चाकूचा उपयोग करुन नाही तर, साधारन दिसणाऱ्या रुमालाचा वापर करुन माणसांची शिकार करायचा. असं देखील सांगितलं जातं की, त्याने रुमालाच्या मदतीने तब्बल 931 लोकांची गळा दाबून हत्या केली. बेहरामची ही पद्धत इतक्या स्वच्छतेने केली जात होती की मृतदेहही सापडत नव्हते.

हत्या करताना बेहराम कधीच एकटा नसायचा… त्याच्यासोबत त्याची 200 लोकांची टोळी असायची. बेहराम आणि त्याचे साथीदार उद्योजक, यात्रेकरू आणि पर्यटक यांच्यासोबत एकत्र प्रवास करायचे आणि वेळ साधत सर्व निष्पाप लोकांवर हल्ला करायचे. त्यांना मारुन टाकायचे आणि पैसे आणि दागिन्यांची लूट करायचे.

त्या काळात दिल्लीहून ग्वाल्हेर आणि जबलपूरला जाणारे व्यापारी आणि प्रवासी या मार्गांवरून जाणं टाळत होतं. अशात कॅप्टन विल्यम स्लीमन नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याने जर याची चौकशी केली नसती तर हे गूढ कायम राहिलं असतं. 1809 मध्ये, कॅप्टन स्लीमन यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली. वर्षानुवर्षे तपास केल्यानंतर त्यांना कळलं की हे सर्व ठग बेहराम आणि त्याच्या टोळीचे काम होतं.

अधिकाऱ्यांनी बेहराम याच्या टोळीतील अनेकांना कैद केलं आणि त्यानंतर बेहराम याला देखील ताब्यात घेण्यात आलं. तेव्हा बेहराम याचं वय 75 वर्ष होतं. अनेक हत्या केल्याच्या गुन्ह्याखाली बेहराम याला फाशी देण्यात आली. जगातील सर्वात धोकादायक सिरीयल किलर म्हणून त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे.

Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा