AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक लग्न झालेलं असूनही दुसरं लग्न केलं आणि मुलगी झाली, तर संपत्तीत तिला किती वाटा? कोर्टानं सांगितलं!

दुसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलीबाबत मुंबई हायकोर्टाने दिला मोठा निर्णय! काय म्हणालं कोर्ट?

एक लग्न झालेलं असूनही दुसरं लग्न केलं आणि मुलगी झाली, तर संपत्तीत तिला किती वाटा? कोर्टानं सांगितलं!
तरुणीचा पाठलाग करणाऱ्या आरोपीची निर्दोष सुटकाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 22, 2022 | 2:50 PM
Share

मुंबई : एक लग्न झालेलं असूनही जर दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या लग्नापासून मूल झालं, तर त्यालाही संपत्तीत (Property issue) वाटा मिळणार का? वारस म्हणून दुसरं लग्नही वैध (Second Marriage) राहणार का, याबाबत मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. एक याचिका निकाली काढताना मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. एक लग्न झालेलं असताना आणि पहिली बायको जिवंत असतान केलेलं दुसरं लग्न वैध ठरणार नाही, असं कायदा सांगतो. पण दुसऱ्या लग्नापासून झालेलं अपत्यालाही वडिलांच्या संपत्तीत वारसदार म्हणून हक्क मिळायला हवं, असं कोर्टाने म्हटलंय.

एअर इंडिया इंजिनिअरींग सर्विस लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या संपत्तीची वाटणी करताना पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीच्या अपत्यांना त्यात वाटा मिळू नये, यासाठी दाद कोर्टात दाद मागितली होती.

यावर दुसऱ्या पत्नीच्या मुलीनेही कोर्टात आपलं म्हणणं मांडलं. आपल्याला वडिलांच्या संपत्तीत वारसाहक्काने अधिकार मिळावा, असं म्हटलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलंय.

दरम्यान, 1955 च्या हिंदू विवाह कायद्यानुसार, दुसरं लग्न अवैध ठरवलं जातं. असं असलं तरी दुसऱ्या लग्नापासून झालेल्या अपत्याला वडिलांच्या वारसा हक्कावर अधिकार मिळायला हवं, असं कोर्टानं स्पष्ट केलंय.

कोर्टाने मृत व्यक्तीच्या संपत्तीचे समान भाग करुन त्याचा एक हिस्सा हा दुसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलीला देण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार एअर इंडिया इंजिनिअरींग सर्विस लिमिटेडला निर्देशही जारी करण्यात आले आहेत. येत्या चार महिन्यांत याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी, असं कोर्टाने म्हटलंय.

मृत व्यक्तीच्या दुसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलीला त्याच्या संपत्तीचा एक चतुर्थांश हिस्सा देण्यात यावा, असं कोर्टाने यावेळी म्हटलंय. त्यानुसार संपत्तीची विभागणी केली जावी, असंही म्हटलंय. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना एअर इंडिया इंजिनिअरींग सर्विस लिमिटेडकडून जी भरपाई मिळणार आहे, ती देताना त्यानुसार विभागणी केली जावी, असं कोर्टाने स्पष्ट केलंय.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.