AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gowandi: अल्पवयीन सफाई कर्मचारीने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू, गोवंडीतील धक्कादायक प्रकार

डिस्चार्ज वेळी रुग्णालयातील नर्सने सफाई कर्मचारी असलेल्या 16 वर्षीय मुलीला मुलाल इंजेक्शन देण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे या मुलीने मुलाला दोन इंजेक्शन दिले. एक सलाईनमधून दिले. तर दुसरे थेट टोचले. इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच मुलाचा मृत्यू झाला.

Gowandi: अल्पवयीन सफाई कर्मचारीने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू, गोवंडीतील धक्कादायक प्रकार
बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 8:38 PM
Share

मुंबई : रुग्णालयात सफाई कर्मचारी असलेल्या अल्पवयीन मुलीने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे एका दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, रुग्णालयातील नर्स आणि सदर अल्पवयीन मुलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. डॉ. अल्ताफ अब्दुल हसन खान, नसिमुद्दीन सय्यद, सलीम उंनीसा खान अशी आरोपींची नावे आहेत. (Death of a two-year-old boy due to incorrect injection given by a minor cleaner)

चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलाचा मृत्यू

गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या खान कुटुंबियांच्या दोन वर्षाच्या मुलाला उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. त्यामुळे खान परिवाराने त्याला शिवाजीनगरमधील नूर रुग्णालयात 11 जानेवारी रोजी उपचारासाठी दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी मुलाला डिस्चार्जही देण्यात आला होता. डिस्चार्ज वेळी रुग्णालयातील नर्सने सफाई कर्मचारी असलेल्या 16 वर्षीय मुलीला मुलाल इंजेक्शन देण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे या मुलीने मुलाला दोन इंजेक्शन दिले. एक सलाईनमधून दिले. तर दुसरे थेट टोचले. इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच मुलाचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी फरार

मुलाच्या नातेवाईकांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणातून रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. मुलाच्या मृत्यू प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्ताफ अब्दुल हसन खान, रुग्णालयाचे व्यवस्थापक नसिमुद्दीन सय्यद, नर्स सलीम उंनीसा खान आणि अल्पवयीन सफाई कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर चारही आरोपी फरार झाले. मुलाच्या मृत्यूनंतर इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी मुलाच्या नातेवाईकांनी न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तर पोलीस पुढील तपास करीत असून फरार आरोपींचाही शोध घेत आहेत. (Death of a two-year-old boy due to incorrect injection given by a minor cleaner)

इतर बातम्या

Malad Murder : पत्नीची हत्या करुन पतीची गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

Wardha Crime : हिंगणघाट जळीत कांड प्रकरणी न्यायालय 5 फेब्रुवारीला सुनावणार निकाल

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.