AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई APMC फळ मार्केटमध्ये स्फोट प्रकरण, मुंबई फिरायला जायचंय, मित्राची कार मागितली, नंतर कारमधून पेट्रोल काढून ट्रक पेटवली

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटच्या बहुउद्देशीय इमारतीच्या खाली शुक्रवारी (2 जुलै) रात्री दोन वाजता स्फोट घडवून आणण्यात आला होता (Five arrested on Navi Mumbai APMC Fruit Market eicher car blast case).

मुंबई APMC फळ मार्केटमध्ये स्फोट प्रकरण, मुंबई फिरायला जायचंय, मित्राची कार मागितली, नंतर कारमधून पेट्रोल काढून ट्रक पेटवली
नवी मुंबईच्या फळ मार्केटमध्ये आयशर गाडीत स्फोट
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 07, 2021 | 10:41 PM
Share

मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटच्या बहुउद्देशीय इमारतीच्या खाली शुक्रवारी (2 जुलै) रात्री दोन वाजता स्फोट घडवून आणण्यात आला होता. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हा स्फोट घडवून आणणाऱ्या आरोपीदेखील या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. एपीएमसी पोलिसांनी अब्बास खान नावाच्या इसमाला अटक केली होती. त्याचबरोबर त्याचा मुलगा आणि मुख्य आरोपी सोहेल याच्यासह तीन साथीदार आफताब खान, निझमुदिन खान, तौशिफा शेख यांना अटक करण्यात आली आहे. सोहेल आणि त्याचे साथीदार गाडीत स्फोट घडवून आणत असताना अचानक स्फोट झाला. यामध्ये सोहेलाचा चेहरा भाजल्यामुळे तो कोपरखैरणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे (Five arrested on Navi Mumbai APMC Fruit Market eicher car blast case).

आरोपींनी नेमकं काय सांगितलं?

नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. अब्बासच्या सांगण्यावरून सोहेल आणि त्याच्या तीन साथीदारांनी संबंधित स्फोट घडवून आणला. या प्रकरणी पाच जणांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी सोहेल याने आपल्या 3 साथीदारांसोबत एका मित्राकडून मुंबई फिरायला जायचं कारण सांगून कार घेतली. त्याने कारमध्ये 500 रुपयांचे पेट्रोल टाकलं. पण मुंबईकडे न जाता त्यांनी फळ मार्केटच्या शेजारी एका कॅनमध्ये गाडीतून पेट्रोल काढलं. त्यानंतर मार्केटमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकला आग लावली, असा दावा आरोपी सोहेल याने कबुली जबाबात केला आहे. पण हल्ल्याची भीषणता बघता फक्त पेट्रोलमुळे हा स्फोट झालेला नाही, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी गाडीचे नमुने फॉरेन्सिक विभागाला पाठवले आहेत. पोलिसांचा पुढच्या तपास सुरू आहे (Five arrested on Navi Mumbai APMC Fruit Market eicher car blast case).

नेमकं प्रकरण काय?

मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये बहुउद्देशीय इमारतीखाली शनिवारी रात्री अडीच वाजता एका गाडीत स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटामुळे मार्केट परिसरात मोठी खळबळ उडाली होती. यावेळी फळ मार्केट परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याने ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली नव्हती. स्फोटाचा आवाज एवढा भंयकर होता की काहीवेळ काय घडले हा अंदाज बांधणे कठीण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं. गाडीच्या मागील भागाच्या पूर्ण चिंधड्या झाल्या होत्या. जवळपास 25 ते 30 फूट अंतरावर असलेल्या कार्यालयाच्या काचा तडकल्या होत्या. परिसरात अनेक गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. परंतू वेळीच अग्निशामक गाडी आल्याने पुढील दुर्घटना टळली. गाडीमध्ये स्फोटक ठेऊन गाडी उडवण्यात आली, अशी प्रतिक्रिया गाडी चालक राजीव कुमार यादवने दिली होती.

स्फोट घडवून आणल्याचा ट्रक चालकाचा दावा

मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये राजीव कुमार यादव ही व्यक्ती अब्बास नामक व्यक्तीकडे कामाला होती. त्याने काही दिवसांपूर्वी अब्बासकडून गाडी विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गाडीचे पूर्ण पैसे अब्बास यांना देऊनही त्यांनी गाडी माझ्या नावावर केली नसल्याचं राजीव कुमार यादव या गाडी चालकाने सांगितलं. तर अब्बास आणि गाडी चालकामध्ये गेल्या काही दिवसांपासून कुर्ला येथील माल वाहतुकीवरून वाद असल्याचं समजतं.

साडे सात लाख रुपयात अब्बास यांनी यादव यांना गाडी विकली होती. एक वर्षभरापूर्वी अब्बास यांचा मुलगा रमझान याने गाडीच्या काचा फोडून चालकाला मारहाण केली होती, अशी माहिती मिळतेय. दरम्यान, त्या दिवशी चालकाने दुपारी 4 वाजता गाडी मार्केटमध्ये उभी केली होती. रात्री दोन वाजता फोन आला की गाडी जळत आहे. मी येईपर्यंत गाडी पूर्ण जाळून खाक झाली होती. तर बॅटरी, इंजिन आणि इतर पार्टस गाडीचे शाबूत असल्याने हि घटना शॉटसर्किट मुळे घडली नाही तर ती उडवून देण्याचा प्रयत्न झाल्याचं यादवने सांगितलं. गाडीवर बांधण्यात आलेली ताडपत्री व नायलॉन रस्सी जवळपास तीस फूट उंच उडून जाऊन पडली होती.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईतील फळमार्केटमध्ये एका गाडीत भीषण स्फोट, परिसरात भीतीचं वातावरण

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी