AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांनी घेतली शिक्षकांचीच ‘शाळा’, काय झाले नेमके पाहा

उल्हासनगरात वाढत चाललेली बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी थेट शिक्षकांचीच शाळा घेतली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवून त्यांना गैरमार्गाला जाऊ न देण्याचं आवाहन यावेळी पोलिसांनी केलं.

पोलिसांनी घेतली शिक्षकांचीच 'शाळा', काय झाले नेमके पाहा
पुणे पोलीस
| Edited By: | Updated on: Jan 20, 2023 | 6:00 PM
Share

उल्हासनगर : मुलांना ज्ञानाबरोबर मूल्य शिक्षण देण्याचे काम शिक्षक करत असतात. शिक्षकांनी मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवले तर अनेक मुले गुन्हेगारीपासून लांब राहू शकतात. यामुळे मुलांना घडवण्यात आई-वडिलांपेक्षाही शिक्षकांचा मोठा वाटा आहे. पोलिसांनी आता मुळावरच घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी मुलांना शिक्षण दिले जाते, त्याच ठिकाणी त्यांना गुन्हेगारीपासून रोखल्यास उद्याचे गुन्हेगार तयार होणार नाही.

उल्हासनगर पोलिसांनी केलेला हा उपक्रमाची चांगलीच चर्चा होत आहे. त्याचे सकारात्मक परिणामही लवकरच दिसणार आहे. उल्हासनगरात वाढत चाललेली बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी थेट शिक्षकांचीच शाळा घेतली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवून त्यांना गैरमार्गाला जाऊ न देण्याचं आवाहन यावेळी पोलिसांनी केलं.

उल्हासनगर परिमंडळ ४ मध्ये गेल्या काही दिवसांत अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. नुकतीच एका टोळक्याने २५ ते ३० गाड्यांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला होता. ही तोडफोड करणारी सर्व मुलं एका मोठ्या शाळेत आठवी आणि नववीत शिकणारी असल्याचं समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी उल्हासनगरातील शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची एक बैठक आयोजित केली होती. उल्हासनगरात वाढत चाललेली बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी थेट शिक्षकांचीच शाळा घेतली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवून त्यांना गैरमार्गाला जाऊ न देण्याचं आवाहन यावेळी पोलिसांनी केलं.

या बैठकीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर काटेकोरपणे लक्ष ठेवत त्यांना गैरमार्गाला जाण्यापासून रोखावं आणि योग्य शिस्त लावावी, त्यांच्यात जनजागृती करावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं. या बैठकीला जवळपास २०० ते २५ शिक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...