AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर धोका टळला! अंजनारी पुलावरुन कोसळलेल्या अपघातग्रस्त टँकरमधील गॅस शिफ्ट करण्यात यश

Mumbai Goa Highway Accident News : टँकरमध्ये गॅस भरलेला असल्यानं तो दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्याची गरज होती. त्यासाठी शुक्रवारी सकाळीच एक पथकही तैनात करण्यात आलं होतं. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर या टँकरमधील गॅस शिफ्ट करण्यात यश आलं आहे.

अखेर धोका टळला! अंजनारी पुलावरुन कोसळलेल्या अपघातग्रस्त टँकरमधील गॅस शिफ्ट करण्यात यश
अपघातग्रस्त टँकरImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Sep 24, 2022 | 7:13 AM
Share

मनोज लेले, प्रतिनिधी, रत्नागिरी : मुंबई गोवा हायवेवर असलेल्या (Mumbai Goa Highway News) अंजनारी पुलावरील (Anjnari Bridge Traffic) वाहतूक अखेर सुरु करण्यात आलीय. तब्बल 35 तासांनंतर ही वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आल्यानं मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. गॅस टँकरच्या अपघातामुळे (LPG Tanker Accident) अंजनारी पुलावरील वाहतूक गुरुवारपासून थांबण्यात आली होती. पर्यायी मार्गाने या महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आलेली होती. अखेर आता पुन्हा ही वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आलीय.

अपघातग्रस्त कंटेनरच्या गॅसची भीती

गुरुवारी दुपारी एलपीजीची वाहतूक करणारा एक टँकर अंजनारी पुलावरुन नदीत कोसळलेला. या टँकरमध्ये 18 मॅट्रिक टन इतका गॅस होता. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत या मार्गावरची वाहतूक तत्काळ रोखण्यात आली होती. अखेर पर्यायी मार्गाने या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली. पुलावरुन कोसळल्यामुळे गॅस टँकरचं मोठं नुकसान झालंही होतं.

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

बचाव पथकाला यश

टँकरमध्ये गॅस भरलेला असल्यानं तो दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्याची गरज होती. त्यासाठी शुक्रवारी सकाळीच एक पथकही तैनात करण्यात आलं होतं. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर या टँकरमधील गॅस शिफ्ट करण्यात यश आलं आहे. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली असून मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आलीय.

35 तासांनी वाहतूक पूर्वपदावर

अंजनारी पुलावरुन कोसळलेला एलपीजीचा कंटेनर नदीत पडला होता. या टँकरमधील गॅस शिफ्ट करण्याचं मोठं आव्हानं उभं ठाकलं होतं. अखेर हे आव्हानं बचाव पथकानं पूर्ण केल्यानं आता मोठा धोका टळला आहे. 35 तास मुंबई गोवा महामार्गावरील अंजनारी पुलावरील वाहतूक ठप्प होती. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाने जाण्याशिवाय दुसरं गत्यंतर उरलं नव्हतं. अखेर आता पुन्हा ही वाहतूक सुरु करण्यात आल्यानं मोठा दिलासा मिळालाय.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच