भंडारा : नाशिकमध्ये (Nashik News) 25 वर्षांचा तरुण धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच, आता आणखी एक दुःखद घटना भंडाऱ्यातून (Bhandara Drowned) समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. तलावाच्या पाण्यात नववीत शिकणारा भारत पाठक (Bharat Pathak) या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. ‘लवकर जाऊन येतो’, असं आजीला सांगून भारत घरातून गेला होता. पण तो जिवंत परतलाच नाही. त्याचा मृतदेहच थेट घरी आल्यामुळे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.