AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजीला म्हणाला ‘लवकर जाऊन येतो’, पण नववीतील तो विद्यार्थी जिवंत परतलाच नाही! थेट मृतदेहच घरी आला

Bhandara Drowned News : भारत हा अड्याळ येथील विवेकानंद विद्याभवन शाळेत इयत्ता नववीत शिकत होता. त्याची आई बाहेरगावी गेली होती. भारतच्या आजीने त्याला सकाळी जेवण करायला सांगितलं. पण बाहेर जाऊन लवकर येतो, असं सांगून तो निघून गेला होता.

आजीला म्हणाला 'लवकर जाऊन येतो', पण नववीतील तो विद्यार्थी जिवंत परतलाच नाही! थेट मृतदेहच घरी आला
बंधाऱ्यात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यूImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Sep 12, 2022 | 8:14 AM
Share

भंडारा : नाशिकमध्ये (Nashik News) 25 वर्षांचा तरुण धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच, आता आणखी एक दुःखद घटना भंडाऱ्यातून (Bhandara Drowned) समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. तलावाच्या पाण्यात नववीत शिकणारा भारत पाठक (Bharat Pathak) या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. ‘लवकर जाऊन येतो’, असं आजीला सांगून भारत घरातून गेला होता. पण तो जिवंत परतलाच नाही. त्याचा मृतदेहच थेट घरी आल्यामुळे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

भारत ओमप्रकाश पाठक हा 15 वर्षांचा मुलगा पवनी तालुक्यातील चकारा या गावात राहायला होता. गावालगत असलेल्या मालगुजारी तलावावर भारत अंघोळीसाठी गेला होता. पण तिथेच त्याचा बुडून मृत्यू झाला होता. चार तास शोध घेतल्यानंतर भारतचा मृतदेह आढळून आला.

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

लवकर येतो, म्हणाला होता! पण…

भारत हा अड्याळ येथील विवेकानंद विद्याभवन शाळेत इयत्ता नववीत शिकत होता. त्याची आई बाहेरगावी गेली होती. भारतच्या आजीने त्याला सकाळी जेवण करायला सांगितलं. पण बाहेर जाऊन लवकर येतो, असं सांगून तो निघून गेला होता. त्यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गावालगतच्या मालगुजारी तलावावर भारतची सायकल, कपडे आणि चपला दिसून आल्या. हे कळताच गावातील लोकांनी तलावाजवळ धाव घेतली.

या संपूर्ण प्रकाराची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सौंदड येथील मासेमारांना भारतचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आलं. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर 15 वर्षांच्या भारतचा मृतदेह तलावात आढळून आला. यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय. ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर संपू्र्ण गाव शोकाकूल झाला होता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.