AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्षुल्लक वाद जीवावर बेतला; 24 तासात तिहेरी हत्याकांडाने उपराजधानी हादरली

दोन हत्या नागपूर शहरात तर एक हत्या ग्रामीण भागात घडल्याचे समोर आले आहे. या हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे.

क्षुल्लक वाद जीवावर बेतला; 24 तासात तिहेरी हत्याकांडाने उपराजधानी हादरली
24 तासात तिहेरी हत्याकांडाने उपराजधानी हादरली
| Edited By: | Updated on: Nov 14, 2022 | 1:44 PM
Share

नागपूर : नागपुरात गुन्हेगारांनी पुन्हा डोकं वर काढल्याचं दिसतंय. गेल्या 24 तासात झालेल्या तिहेरी हत्याकांडाने नागपुरात खळबळ माजली आहे. दोन हत्या नागपूर शहरात तर एक हत्या ग्रामीण भागात घडल्याचे समोर आले आहे. या हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. मात्र गुन्हेगारी कमी झाल्याचा पोलिसांचा दावा गुन्हेगारांनी खोडून काढल्याचे दिसते.

जुन्या वादातून लष्करी बाग भागात एकाची हत्या

हत्येची पहिली घटना ही पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या लष्करीबाग भागात घडली आहे. रोहन शंकर बिहाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास तिघांनी चाकू आणि लोखंडी रॉडने रोहनवर हल्ला केला. ज्यामध्ये रोहनचा मृत्यू झाला आहे.

आरोपी वीरेंद्र उर्फ बाबू बकरी, यशोदास उर्फ सॅनकी आणि अश्विन या तिघांसोबत रोहनचा वाद सुरू होता. रात्री रोहन वस्तीत बाहेर हात शेकत असताना त्यांच्यात जुना वाद उफाळून आला आणि याच वादातून तिघांनी मिळून हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

इमामवाडा येथे दारुच्या नशेत झालेल्या वादातून एकाची हत्या

हत्येची दुसरी घटना नागपूरच्या इमामवाडा भागात घडली आहे. दोन आरोपींनी मिळून एकाची हत्या केली. रामसिंग ठाकूर असे मयत इसमाचे नाव आहे. किरकोळ वादातून दोन मजुरांनी संगनमताने रामसिंगची हत्या केल्याचं स्पष्ट झाले आहे.

मृतक रामसिंग ठाकूर आणि आरोपी राजू बुरडे मुकेश अंबुरे हे तिघेही मजूर असून इमामवाडा येथील झोपडपट्टीत एकत्र राहत होते. तिघांना दारूचे व्यसन असून, क्षुल्लक कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. या वादातून राजू आणि मुकेश यांनी रामसिंगच्या डोक्यावर वार केले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपींनी रामसिंगचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर दोन्ही आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

गंगापूर शिवारात तिसरी हत्या

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीच्या टाकळघाट परिसरातील गंगापूर शिवारात हत्येची तिसरी घटना घडली. सुनील गुलाबराव भजे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. सुनील पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोघांनी लोखंडी रोडने हल्ला करून त्यांची हत्या केली. दिलीप गेडाम आणि वंश उर्फ दादू मांजी असे आरोपींचे नावं असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.