AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | संघ मुख्यालयाची रेकी प्रकरण, दहशतवादी रईस शेखचा मोबाईल जप्त, कोणाकोणाच्या संपर्कात?

रईस ज्या हॅाटेलमध्ये थांबला होते, तिथे नेऊन एटीएसने त्याची चौकशी केली. रईसचा स्थानिक हस्तक कोण आहे, याचा शोध सुरु आहे. सध्या दहशतवादी रईस अहमद शेख सदाउल्ला शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे

Nagpur | संघ मुख्यालयाची रेकी प्रकरण, दहशतवादी रईस शेखचा मोबाईल जप्त, कोणाकोणाच्या संपर्कात?
नागपूर संघ कार्यालयाची अतिरेकीकडून रेकीImage Credit source: टीव्ही 9
| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 7:46 AM
Share

नागपूर : जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय (Nagpur RSS Headquarters) आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याप्रकरणी जैशचा दहशतवादी (Terrorist) रईस अहमद शेख सदाउल्ला शेखचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मोबाईलद्वारे रईसने कुठे कुठे कोणाशी संपर्क साधला याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रईसचा मोबाईल नागपूर दहशतवादविरोधी पथकाने (Nagpur ATS) सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवला आहे. काही दिवसांपूर्वीच एटीएसने काश्मीरमधून त्याचा ताबा मिळवला होता.

रईस ज्या हॅाटेलमध्ये थांबला होते, तिथे नेऊन एटीएसने त्याची चौकशी केली. रईसचा स्थानिक हस्तक कोण आहे, याचा शोध सुरु आहे. सध्या दहशतवादी रईस अहमद शेख सदाउल्ला शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 15 जुलैला नागपुरात येऊन रईस शेखने संघ मुख्यालय, स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याचं समोर आलं आहे. नागपुरात कोतवाली पोलिसांनी रईस शेख विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने काश्मीरमध्ये जाऊन रईस शेखला अटक केली.

काय आहे प्रकरण?

संघ बिल्डिंग आणि हेडगेवार स्मृती भवनाची रेकी करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला काश्मीरमधून दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याला प्रॉडक्शन वॉरंटवर नागपुरात आणण्यात आले असून त्याची चौकशीही सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव रईस अहमद शेख असदुल्ला शेख (वय 26 वर्ष, रा. खाटी अवंतीपोरा, पुलवामा) असल्याचे सांगण्यात आले.

जैशच्या हस्तकाची सूचना

पाकव्याप्त काश्मीरमधून जैशचा हस्तक उमरच्या सांगण्यावरून रईस जुलैमध्ये नागपुरात आला होता. संघाची दोन्ही प्रमुख ठिकाणे पाहिल्यानंतर ते काश्मीरला परतले. सप्टेंबर 2021 मध्ये रईसला काश्मीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती.

संशय टाळण्यासाठी युक्ती

मिलिटरी इंटेलिजन्स टीमने चौकशी केली असता, रईसने जुलैमध्ये नागपूरला गेल्याचे सांगितले होते. कोणीही त्याच्यावर संशय घेऊ नये, म्हणून श्रीनगर ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर अशी फ्लाईट बुक करण्यात आली होती. सेंट्रल एव्हेन्यू रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये त्याने रूम बुक केली. रिक्षाने संघ भवन आणि तिथून हेडगेवार भवनला तो गेला होता.

दोन्ही ठिकाणांची रेकी करून मोबाईलवर व्हिडीओ तयार करून त्याने तो उमरला पाठवला. यानंतर नागपूर पोलिसांचे आणि महाराष्ट्र एटीएस आणि आयबीला माहिती मिळाली. एका पथकाने श्रीनगरला जाऊन त्याची चौकशीही केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास नागपूर एटीएसकडे सोपवण्यात आला. दोन दिवसांपूर्वी एटीएसच्या पथकाने त्याला प्रॉडक्शन वॉरंटवर नागपुरात आणले होते.

वाईट कॉलिटीच्या व्हिडीओमुळे ओरडा

यापूर्वी पोलिसांनी सांगितले होते की पाकव्याप्त काश्मीरमधून उमरच्या सूचनेनुसार रईस येथे रेकी करण्यासाठी आला होता. नागपूरला पोहोचल्यानंतर एक व्यक्ती संपर्क करेल, असे उमरने त्याला सांगितले होते. त्याच्या मदतीनेच त्याला रेकीचे काम करावे लागणार होते, मात्र तो नागपूरला पोहोचला तेव्हा कोणीही मदतीला आले नाही. अशा परिस्थितीत त्याने स्वत: दोन्ही ठिकाणी जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. व्हिडिओ निकृष्ट दर्जाचे होते आणि ते दुरुन घेतले गेले. त्यामुळे उमरने त्याला फटकारले पण भीतीपोटी त्याने पुन्हा व्हिडीओ काढला नाही आणि फोन बंद केला.

मात्र रईस केवळ तपास यंत्रणांची दिशाभूल करत असल्याचं बोललं जातं. त्याने दोन्ही ठिकाणांचा बारकाईने मागोवा घेतला आणि पीओकेमध्ये बसलेल्या जैशच्या हँडलरला सर्व माहिती शेअर केली. रईसच्या मदतीसाठी नागपुरात कोणाला पाठवले जाणार होते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याबाबत सध्या संपूर्ण गुप्तता पाळण्यात येत आहे

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.