AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Accident : भाऊबीजेचा दिवस, मुलगा बाईकवर, आई डबलसीट, सुसाट वेगानं बस आली अन्…

दुर्दैवी! भाऊबीजेच्या दिवशी घडली काळीज पिळवटून टाकणारी घटना, नेमका कशामुळे झाला अपघात?

Nagpur Accident : भाऊबीजेचा दिवस, मुलगा बाईकवर, आई डबलसीट, सुसाट वेगानं बस आली अन्...
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Oct 27, 2022 | 10:56 AM
Share

नागपूर : बुधवारी भाऊबीज एकीकडे उत्साहात साजरी केली जात होती. अशातच नागपूरमध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. नागपुरात (Nagpur News) बुधवारी दुपारी आई आणि तरुण मुलगा बाईकवरुन जात होती. यावेळी एका भरधाव बसने (Nagpur Bus And Bike Accident) दुचाकीला धडक दिली आणि या धडकेत आईचा जागीच मृत्यू (Nagpur Accident News) झाला. तर मुलगी जखमी झाला. या घटनेनंतर स्थानिक आक्रमक झाले होते. संतप्त जमावाने यावेळी बसवर दगडफेक केली आणि आपला राग व्यक्त केला. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे.

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नागपूरच्या मानेवाडा बेसा मार्गावर ही दुर्दैवी घटना घडली. परिवर्तन चौकात घडलेल्या या घटनेनंतर एकच संपात व्यक्त करण्यात आला. स्टार बसच्या धडकेत दुचाकीवरुन खाली पडलेल्या महिलेच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. यावेळी रस्त्यावर एकच गोंधळ उडाला.

पाहा लाईव्ह घडामोडी :

डोळ्यांदेखत आईला गमावलं

मृत्यू झालेल्या महिलेचं नाव सुषमा गजानन पाठक असं आहे. त्या 55 वर्षांच्या होत्या. आपल्या मुलासह त्या दुचाकीवरुन जात होत्या. या अपघातात त्यांचा मुलगा प्रतीक गजानन पाठक हा या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. मात्र आईचा डोळ्यांसमोर झालेला मृत्यू पाहून त्याच्या मनावर मोठा आघात झाला आहे.

या अपघातप्रकरणी पोलिसांनी स्टार बसच्या चालकावर गुन्हा नोंदवून घेत त्याला अटक केलीय. एमएच 31 सीए 6224 या क्रमाकांची बस पाठक यांच्या एमएच 31 बीपी 6688 या दुचाकीला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यानंतर रस्त्यावरील नागरिकही संतापले होते.

लोकांनी केलेल्या दगडफेकीत बसचं नुकसान झालंय. लोकांनी दगडफेक केल्यामुळे या बसच्या काचा फुटल्या होत्या. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.