AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime | नाशिकमध्ये महिनाभरापूर्वी प्राणप्रतिष्ठा केलेले मंदिर फोडले; दीड किलोची मूर्ती लंपास

नाशिकचा प्रवास नेमका कुठे सुरू आहे, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे. इतक्या वेगाने होणारे गुन्हेगारीकरण सर्वांनाच चिंतेत टाकणारे आहे.

Nashik Crime | नाशिकमध्ये महिनाभरापूर्वी प्राणप्रतिष्ठा केलेले मंदिर फोडले; दीड किलोची मूर्ती लंपास
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Jan 19, 2022 | 9:59 AM
Share

नाशिकः नाशिकमध्ये सतत सुरू असलेल्या चोरीच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीत. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. आता उत्तमनगरमध्ये अवघ्या महिनाभरापूर्वी प्राणप्रतिष्ठा केलेले मंदिर फोडून चोरट्यांनी दीड किलोची मूर्ती लंपास केली आहे. त्यामुळे भक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्त जयंती उत्साहात

नाशिकमधील उत्तरनगरात महिनाभरापूर्वी श्री गुरुदेव दत्ताचे मंदिर साकारण्यात आले आहे. भक्तांनी पितळेच्या धातूपासून घडविलेली गुरुदेव दत्तांची विलोभनीय मूर्ती आणली. चौकातील झाडाखाली मोठ्या आस्थेने या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. येथे काही दिवसांपूर्वी दत्त जयंतीचा सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा होऊन अजून धड एक महिनाही पूर्ण होत आला नाही. तो चोरट्यांनी मंदिर फोडून मूर्ती लंपास केल्याने भक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घर नाही तर नाही, चक्क लहान-लहान मंदिरेही सुरक्षित नसल्याबद्दल ते रोष व्यक्त करत आहेत.

पोलिसांसमोर आव्हान

चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर भक्त परिवाराने अंबड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत मूर्तीचे वर्णन केले आहे. लवकरात लवकर या चोरीचा छडा लावून चोरट्यांना बेड्या ठोकाव्यात अशी मागणी केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्येही धास्ती आहे.

नेमके चाललेय तरी काय?

नाशिकमध्ये नेमके चाललेय तरी काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी एकाच आठवड्यात तीन खून झाले. त्यात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला संपवले. हा प्रश्न विधिमंडळातही गाजला. त्यानंतर काही दिवसात एकाच आठवड्यात तीन दरोडे पडले. चोरीच्या घटना तर सुरूच असतात. त्यामुळे नाशिकचा प्रवास नेमका कुठे सुरू आहे, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे. इतक्या वेगाने होणारे गुन्हेगारीकरण सर्वांनाच चिंतेत टाकणारे आहे. दरम्यान, या चोरीप्रकरणी पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून चोरट्यांना बेड्या ठोकाव्यात अशी मागणी भक्तांनी केली आहे.

इतर बातम्याः

Nashik | नाशिकमध्ये कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवली का; बळींच्या रेकॉर्डमध्ये पावणेतीन हजारांची भर कशी?

Nashik | लोकशाहीवरील अढळ निष्ठेसाठी विविध कार्यक्रम, जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व संस्थांना सूचना काय?

Agri | वायदे बाजार बंदी हटवा, जीएम तंत्रज्ञानाला परवानगी द्या; स्वतंत्र भारत पक्षाचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली