‘चला, नाशिक आलंय…’ कंडक्टर मागे पॅसेंजरला उठवायला गेला आणि तितक्यात…

नाशिकमध्ये झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघाताच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हळहळला...

'चला, नाशिक आलंय...' कंडक्टर मागे पॅसेंजरला उठवायला गेला आणि तितक्यात...
भीषण अपघात...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 11:12 AM

विनायक डावरुंग, TV9 मराठी, नाशिक : शनिवारची सकाळ अपघाताच्या एका मोठ्या बातमीने उजाडली. पहाटे पाच-साडे पाच वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ चिंतमणी ट्रॅव्हल्सच्या (Chintamani Travels) खासगी बसचा भीषण अपघात (Nashik Bus Accident) झाला. यवतमाळमधील (Yavatmal) पुसदहून मुंबईच्या दिशेनं ही बस जात होता. पण वाटेतच कोळशाने भरलेला ट्रक आणि लक्झरी बस यांच्यात जोरदार धडक झाली आणि हा अपघात घडला. या अपघातानंतर बसने पेट घेतला आणि बसमधील प्रवासी आगीत होरपळले. या अपघाताबाबतची माहिती कशी कळली, याबाबत चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.

चिंतामणी ट्रॅव्हल्सचे संचालक गुड्डू जयस्वाल यांना बसच्या कंडक्टरने अपघाताची माहिती दिली. सकाळी पाच-साडे पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांना कंटक्टरने फोन केला आणि बस अपघाताबाबत सांगितलं. गुड्डू जयस्वाल यांनी म्हटलं की…

सकाळी मला माझ्या कंडक्टरचा कॉल आला. ‘अपघात झालाय, मोठा अपघात आहे’, इतकंच तो म्हणाला. त्यालाही नेमकं काय झालंय, हे कळलं नाही. कंटक्टर अपघातावेळी नेमका बसच्या मागच्या बाजूला गेला होता.

हे सुद्धा वाचा

ड्रायव्हर गाडी लेफ्ट साईडला घेत होता. तेव्हा कंटक्टर मागे पॅसेंजरला उठवायला गेला. ‘चला नाशिक आलंय’, असं म्हणत तो जेव्हा मागे गेला, तितक्यात अपघात घडला. त्याच्यामुळे अपघात कसा घडला, धडक कशी बसली, हे तोही सांगू शकला नाही.

शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बसने पेट घेतला असावा, असा अंदाज गुड्डू जयस्वाल यांनी व्यक्त केला. पण निश्चित काहीच सांगता येणार नाही, असंही ते म्हणाले. ही बस यवतमाळ ते मुंबई व्हाया नाशिक मार्गे जात होती. या बसमध्ये 30 पॅसेंजर होते, असंही त्यांनी म्हटलंय.

बसच्या मेन्टेनन्सचं काय?

बसचा फिटनेस, रेग्यूलर मेन्टेनन्स प्रत्येक ट्रीप आधी तपासला जातो, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. पण हा अपघात असल्यामुळे नेमकं काय घडलं, याबाबत ठोस काही सांगता येऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.

प्रवाशांच्या खिडकीतून उड्या

नाशिक बस अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की, आग लागल्यानंतर बसमधील प्रवाशांनी थेट खिडकीतून उड्या टाकल्या. जखमी झालेल्या एका प्रवाशाने सांगितलं की, बस जशी धडकली, तशी लगेचच आग लागली. नाशिक हायवेला बायपासवर हा अपघात घडला. संपूर्ण बसमध्ये जाळ पसरल्यामुळे उतरायचं कसं, असा प्रश्न होता. अखेर एका प्रवाशाने स्वतःचा आणि बायकोचा जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी मारल्याचं सांगितलं.

अपघातातून बचावलेला दुसरा एक तरुण चार जणांसोबत मुंबईला जायला निघाला होता. बसमध्ये आग लागल्यानंतर बसचा दरवाजा उघडत नव्हता, अशी माहिती त्याने दिली. त्यामुळे अखेर खिडकीतून आम्ही उड्या टाकल्या आणि जीव वाचवला, असं बसमधील प्रवाशाने सांगितलंय.

नाशिक बस अपघातामध्ये 10 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. या बसमध्ये 48 प्रवासी असल्याची माहिती समोर आलीय. बसची प्रवासी संख्या 30 होती. त्यामुळे जास्त प्रवासी बसमध्ये असल्यानं कारवाई केली जाणार, असल्याचंही सांगितलं जातंय. सध्या जखमी प्रवाशांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....