AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चला, नाशिक आलंय…’ कंडक्टर मागे पॅसेंजरला उठवायला गेला आणि तितक्यात…

नाशिकमध्ये झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघाताच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हळहळला...

'चला, नाशिक आलंय...' कंडक्टर मागे पॅसेंजरला उठवायला गेला आणि तितक्यात...
भीषण अपघात...Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 08, 2022 | 11:12 AM
Share

विनायक डावरुंग, TV9 मराठी, नाशिक : शनिवारची सकाळ अपघाताच्या एका मोठ्या बातमीने उजाडली. पहाटे पाच-साडे पाच वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ चिंतमणी ट्रॅव्हल्सच्या (Chintamani Travels) खासगी बसचा भीषण अपघात (Nashik Bus Accident) झाला. यवतमाळमधील (Yavatmal) पुसदहून मुंबईच्या दिशेनं ही बस जात होता. पण वाटेतच कोळशाने भरलेला ट्रक आणि लक्झरी बस यांच्यात जोरदार धडक झाली आणि हा अपघात घडला. या अपघातानंतर बसने पेट घेतला आणि बसमधील प्रवासी आगीत होरपळले. या अपघाताबाबतची माहिती कशी कळली, याबाबत चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.

चिंतामणी ट्रॅव्हल्सचे संचालक गुड्डू जयस्वाल यांना बसच्या कंडक्टरने अपघाताची माहिती दिली. सकाळी पाच-साडे पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांना कंटक्टरने फोन केला आणि बस अपघाताबाबत सांगितलं. गुड्डू जयस्वाल यांनी म्हटलं की…

सकाळी मला माझ्या कंडक्टरचा कॉल आला. ‘अपघात झालाय, मोठा अपघात आहे’, इतकंच तो म्हणाला. त्यालाही नेमकं काय झालंय, हे कळलं नाही. कंटक्टर अपघातावेळी नेमका बसच्या मागच्या बाजूला गेला होता.

ड्रायव्हर गाडी लेफ्ट साईडला घेत होता. तेव्हा कंटक्टर मागे पॅसेंजरला उठवायला गेला. ‘चला नाशिक आलंय’, असं म्हणत तो जेव्हा मागे गेला, तितक्यात अपघात घडला. त्याच्यामुळे अपघात कसा घडला, धडक कशी बसली, हे तोही सांगू शकला नाही.

शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बसने पेट घेतला असावा, असा अंदाज गुड्डू जयस्वाल यांनी व्यक्त केला. पण निश्चित काहीच सांगता येणार नाही, असंही ते म्हणाले. ही बस यवतमाळ ते मुंबई व्हाया नाशिक मार्गे जात होती. या बसमध्ये 30 पॅसेंजर होते, असंही त्यांनी म्हटलंय.

बसच्या मेन्टेनन्सचं काय?

बसचा फिटनेस, रेग्यूलर मेन्टेनन्स प्रत्येक ट्रीप आधी तपासला जातो, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. पण हा अपघात असल्यामुळे नेमकं काय घडलं, याबाबत ठोस काही सांगता येऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.

प्रवाशांच्या खिडकीतून उड्या

नाशिक बस अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की, आग लागल्यानंतर बसमधील प्रवाशांनी थेट खिडकीतून उड्या टाकल्या. जखमी झालेल्या एका प्रवाशाने सांगितलं की, बस जशी धडकली, तशी लगेचच आग लागली. नाशिक हायवेला बायपासवर हा अपघात घडला. संपूर्ण बसमध्ये जाळ पसरल्यामुळे उतरायचं कसं, असा प्रश्न होता. अखेर एका प्रवाशाने स्वतःचा आणि बायकोचा जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी मारल्याचं सांगितलं.

अपघातातून बचावलेला दुसरा एक तरुण चार जणांसोबत मुंबईला जायला निघाला होता. बसमध्ये आग लागल्यानंतर बसचा दरवाजा उघडत नव्हता, अशी माहिती त्याने दिली. त्यामुळे अखेर खिडकीतून आम्ही उड्या टाकल्या आणि जीव वाचवला, असं बसमधील प्रवाशाने सांगितलंय.

नाशिक बस अपघातामध्ये 10 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. या बसमध्ये 48 प्रवासी असल्याची माहिती समोर आलीय. बसची प्रवासी संख्या 30 होती. त्यामुळे जास्त प्रवासी बसमध्ये असल्यानं कारवाई केली जाणार, असल्याचंही सांगितलं जातंय. सध्या जखमी प्रवाशांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.