AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | नगरसेवकांच्या सहलीत नगरसेविकेचा मृत्यू; सुरगाणा येथे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच घाला

नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या निवडणुकीत झालाय. येथे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपू्र्वी नगरसेवकांच्या सहलीत गेलेल्या नगरसेविकेचा मृत्यू झालाय. काशीबाई नामू पवार, असे मृत नगरसेविकेचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Nashik | नगरसेवकांच्या सहलीत नगरसेविकेचा मृत्यू; सुरगाणा येथे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच घाला
नगरसेवकांच्या सहलीत नगरसेविकेचा मृत्यू
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Feb 13, 2022 | 4:16 PM
Share

नाशिकः राजकारण अतिशय वाईट असते. त्याला कारण म्हणजे तिथे स्वार्थापायी खुंटीला टांगून ठेवलेली नैतिक मूल्ये. हे इतके विचित्र असते की, आपल्याच पक्षाच्या निवडूण आलेल्या सदस्यांवर श्रेष्ठींचा विश्वास नसतो. त्यामुळे त्यांना विजयानंतर सहलीला पाठविण्याची नसती खटाटोप करावी लागते. मात्र, यात अनेक सामान्य नाहक भरडले जातात. तसाच प्रकार नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) निवडणुकीत झालाय. येथे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपू्र्वी (Election) नगरसेवकांच्या सहलीत गेलेल्या नगरसेविकेचा मृत्यू झालाय. काशीबाई नामू पवार, असे मृत नगरसेविकेचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, अशा घटना घडल्यानंतर तरी राजकारणाचे चित्र बदलेल का, असा प्रश्न कायम आहे. याचे उत्तर कदाचित होय, असे मिळेल याची खात्रीही नाहीच.

नेमके काय घडले?

सुरगाणा नगरपंचायतीमध्ये एकूण 17 जागा आहेत. या ठिकाणी सर्वाधिक आठ जागा मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेनेने सहा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा मिळवली आहे. देवळा येथेही भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. या ठिकाणी एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी 15 जागा भाजपने मिळवल्या आहेत, तर अवघ्या दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. या दोन्ही नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता येण्याचा मार्ग अतिशय सुकर आहे. त्यासाठीच भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यावरून राजकारणही टिपेला पोहचले आहे. सुरगाणा नगरपंचायतीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने काढलेल्या सहली दरम्यान एका नगरसेविकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काशीबाई नामू पवार असे मयत नगरसेविकेचे नाव आहे.

कसा झाला मृत्यू?

सुरगाणा नगरपंचायतीत वार्ड क्रमांक 16 मधून नगरसेविका काशीबाई पवार निवडून आल्या होत्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी भाजपच्या गटातील नगरसेवकांसह नगरसेविकांची सहल काढण्यात आली होती. ऐनवेळी येवून आपले बहुमत जाहीर करण्याचा भाजपचा कल होता. मात्र, वापी येथे एका हॉटेलमध्ये थांबले असताना नगरसेविका काशीबाई पवार यांचा ह्रदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. खुर्चीच्या राजकारणात नगरसेविकेला काळाने गाठल्याने भाजप पुन्हा एकदा वादात सापडले आहे.

सुरगाणा नगरपंचायत

– एकूण जागा – 17

– भाजप – 08

– शिवसेना – 06

– माकप – 02

– राष्ट्रवादी काँग्रेस – 01

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली