AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसभर रस्त्यासाठी राबले, थकून अंग टाकलं अन् क्षणात… अज्ञात वाहनाच्या धडकेत 3 मजूर ठार

जळगावजवळच्या नशिराबाद येथे पुलाच्या ठिकाणी झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नशिराबाद गावाजवळ पुलाच्या ठिकाणी परप्रांतीय मजूर रात्री झोपलेले असतानाच एक अज्ञात वाहन काळ बनून आले.

दिवसभर रस्त्यासाठी राबले, थकून अंग टाकलं अन् क्षणात... अज्ञात वाहनाच्या धडकेत 3 मजूर ठार
वाहनाच्या धडकेत 3 मजूर ठार Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 11, 2025 | 2:27 PM
Share

जळगावजवळच्या नशिराबाद येथे पुलाच्या ठिकाणी झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नशिराबाद गावाजवळ पुलाच्या ठिकाणी परप्रांतीय मजूर रात्री झोपलेले असतानाच एक अज्ञात वाहन काळ बनून आले आणि त्याने चिरडल्याने तिघांचा हकनाक बळी गेला. मंगळवारी पहाटे ही दुर्दैवी घटना उघडकीस येताच एकच कल्लोळ माजला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून त्यांनी तिघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी पाठवले. दरम्यान या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जवळच्या नशिराबाद नजीक असलेल्या खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रोडचे काम सुरू आहे. तेथे अनेक मजूर रात्रंदिवसस घाम गाळून काम करत असतात. काल नेहमीप्रमाणे काम दिवसभर काम केल्यावर काही मजुरांनी रस्त्याच्या कडेलाच अंग टाकले. दमल-भागलेले ते जीव गाढ झोपेत होते, पण सकाळी उठलेच नाहीत. रस्त्याच्या शेजारी असलेल्या पुलावर ते झोपले होते. मजूर झोपलेले असताना अंधारात काही न दिसल्याने अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मृत झालेले हे तीनही मजूर परप्रांतीय होते, मात्रे ते कोणे, नेमके कुठून आले होते, त्यांची ओळख वगैरे यांसदर्भात पोलिसांकडून अद्याप माहिती घेण्याचं काम सुर आहे. या दुर्दैवी अपघाता संदर्भात नशिराबाद पोलीसठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....