AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाडीच्या सर्व्हिसिंगवरुन भांडण, बापानेच झाडल्या मुलावर गोळ्या, उपचारादरम्यान मृत्यू

का निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने रागाच्या भरात आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्यामुळे नवी मुंबईत सध्या तणावाचे वातावरण आहे. या गोळीबारात निवृत्त पोलीस अधिकाऱ्य़ाचा मुलगा विजय पाटील याचा मृत्यू झाला आहे.

गाडीच्या सर्व्हिसिंगवरुन भांडण, बापानेच झाडल्या मुलावर गोळ्या, उपचारादरम्यान मृत्यू
| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 12:20 AM
Share

नवी मुंबई : एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने रागाच्या भरात आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्यामुळे नवी मुंबईत सध्या तणावाचे वातावरण आहे. माथेफिरु निवृत्त पोलीस अधिकाऱ्य़ाचे नाव भगवान पाटील असून मुलगा विजय पाटील याचा  मृत्यू झाला आहे. मृत मुलावर एरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात सुरू होते. ऐरोली येथे 14 जून रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. माथेफिरु पिता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. (Navi Mumbai retired police officer Bhagwan Patil fired Three bullets son Vijay Patil died)

गाडीच्या सर्व्हिसिंगच्या पैशांवरून वाद

आज संध्याकाळी सहाच्या सुमारास भगवान पाटील या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपल्या दोन्ही मुलांवर गोळ्या झाडल्या होत्या. हा प्रकार समोर आल्यानंतर नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली होती. भगवान पाटील या माथेफिरू निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला गोळीबारात तब्बल तीन गोळ्या लागल्या होत्या. घटना घडली तेव्हा भगवान पाटील याने आपल्याच मुलावर गोळीबार का केला ? हे समजू शकलेले नव्हते. मात्र, गाडीच्या सर्व्हिसिंगच्या पैशांवरुन दोघांमध्ये वाद झाला होता, असे आता सांगण्यात येत आहे. पैशांचा वाद नंतर टोकाला गेल्यामुळे भगवान पाटील या पित्याने मुलगा विजय पाटीलवर गोळ्या झाडल्या.

नेमका प्रकार काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील एरोली भागात भगवान पाटील नावाचे निवृत्त पोलीस अधिकारी वास्तव्यास आहेत. विजय पाटील हा त्यांचा मुलगा असून तो सध्या वसईला राहतो. त्याला भगवान पाटील यांनी तुला गिफ्ट द्यायचे आहे असे सांगून घरी बोलावले. त्यानंतर मुलगा घरी आल्यानंतर भगवान पाटील यांनी विजय पाटील तसेच दुसरा मुलगा सुजय पाटील या दोघांवर रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडल्या. यामध्ये विजयच्या पोटात एक आणि खांद्यावर एक गोळी लागली. तर एक गोळी हाताला घासून गेली. तर सुजयच्या अंगाला गोळी घासून गेली. तब्बल तीन गोळ्या लागल्यामुळे विजयची प्रकृती चिंताजनक आहे. यावेळी भगवान पाटील या निवृत्त अधिकाऱ्याने आपल्या पत्नालीसुद्धा मारहाण केली.

आधीही भगवान पाटील यांच्याकडून असेच कृत्य

भगवान पाटील हे माजी नगरसेवक राजू पाटील यांचे नातेवाईक आहेत. भगवान पाटील यांनी याआधीही अशाच प्रकारचे कृत्य केलेले आहे. त्यांनी राजू पाटील यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली होती. या प्रकारामुळे तक्रार दाखल केल्यानंतर भगवान पाटील यांच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली होती. मात्र, आता रिव्हॉल्वहर परत मिळाल्यानंतर भगवान पाटील यांनी आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्या आहेत. या प्रकारामुळे सध्या नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या :

गिफ्ट द्यायच्या बहाण्याने घरी बोलावलं, नंतर मुलावरच झाडल्या तीन गोळ्या, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्याने नवी मुंबई हादरली

आधी खून नंतर जाळलं, युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने साताऱ्यात खळबळ

शहापूर पोलिसांची मोठी कारवाई, तीन दुचाकी चोरांना बेड्या, 10 दुचाकी जप्त

(Navi Mumbai retired police officer Bhagwan Patil fired Three bullets son Vijay Patil died)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.