AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 ऐवजी त्या गाडीत तब्बल 25 प्रवासी कोंबले…गाडी दरीत कोसळल्यावर काय घडलं ?

पेठच्या पळशी आणि चिखली रस्त्यावरील घाटात हा अपघात झाला आहे. शेतमजुरांनी कोंबलेली क्रूझर गाडी ब्रेक फेल झाल्याने दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे.

12 ऐवजी त्या गाडीत तब्बल 25 प्रवासी कोंबले...गाडी दरीत कोसळल्यावर काय घडलं ?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 01, 2022 | 1:57 PM
Share

नाशिक : नाशिकच्या ग्रामीण भागात अवैध वाहतुकीला कधी आळा बसणार ? हा प्रश्न वारंवार निर्माण होऊ लागला आहे. नुकताच नाशिकच्या पेठ रोडवरील चिखली येथील प्रवासू वाहतूक करणारी जीप दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. नाशिकपासून अवघ्या पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी भागात अवैध प्रवासी वाहतूक हा मोठा कळीचा मुद्दा आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. मात्र, याच भागात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर यावर कारवाईची मागणी होत असते. मात्र, अवैध प्रवासी वाहतूक ही डोळ्या देखत होत असतांना प्रशासन कारवाई का करीत नाही ? अशी चर्चा पेठरोडवरील अपघातानंतर होऊ लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात हा अपघात घडला आहे.

पेठच्या पळशी आणि चिखली रस्त्यावरील घाटात हा अपघात झाला आहे. शेतमजुरांनी कोंबलेली क्रूझर गाडी ब्रेक फेल झाल्याने दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे.

क्रूझर गाडी दरीत कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर त्यात धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 12 ऐवजी 24 प्रवासी कोंबलेल्या स्थितीत होते.

या अपघातात दोन प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाला असून इतर जखमी झालेल्या प्रवाशांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नाशिकच्या आदिवासी भागात अवैध प्रवासी वाहतूक नित्याचीच झाली असून विशेष म्हणजे ही वाहतूक करणारी वाहनं कालबाह्य झाली आहे.

मुदत संपलेली वाहनं घेऊन वाहतूक होत असतांना प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास येत नाही का ? की आर्थिकबाबींमुळे डोळेझाक केली जाते अशी चर्चा यानिमित्ताने उपस्थित होऊ लागली आहे.

या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीत गाडीमध्ये कोंबून प्रवाशांना बसवलं जातं, गाडीच्या बोनेट आणि टपावर देखील प्रवासी बसलेले असतात.

त्यामुळे आता या अपघातानंतर तरी प्रशासन दखल घेऊन कारवाई करणार का ? की नेहमीप्रमाणे डोळेझाक करत प्रवाशांच्या जीवाशी खेळणार याकडे पाहणं महत्वाचे आहे.

Follow Us
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...