AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाचा पहिला वाढदिवस, घरी तयारी सुरु होती, पण वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरु होण्याआधीच संपलं, काय घडलं नेमकं?

मुलांचा पहिला वाढदिवस म्हणून घरात उत्साह होता. वाढदिवसाच्या निमित्ताने घरी पूजा आयोजित केली होती. सर्व नातेवाईक घरी जमले होते. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.

मुलाचा पहिला वाढदिवस, घरी तयारी सुरु होती, पण वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरु होण्याआधीच संपलं, काय घडलं नेमकं?
पहिल्याच वाढदिवशी मुलाचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: Google
| Updated on: May 10, 2023 | 6:09 PM
Share

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पहिल्या वाढदिवशी एका निष्पाप मुलाचा वेदनादायक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. खेळता खेळता मुलगा उकळत्या भाजीच्या कढईत पडला. यात गंभीर भाजल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग्रा येथील कागरोल शहरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. या घटनेमुळे घरातील आनंदाचे शोकात रुपांतर झाले आहे. मुलाचा पहिलाच वाढदिवस शेवटचा ठरल्याने नातेवाईकांनाही अश्रू अनावर झाले आहेत.

वाढदिवसानिमित्त पूजा आणि मेजवाणीचे आयोजन केले होते

कागरोल शहरातील विनोद यांना गेल्या वर्षी एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुले झाली. सोमवारी 9 मे रोजी या जुळ्यांचा पहिला वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त घरात पुजेचे आयोजन केले होते. पुजेसाठी आणि वाढिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अनेक नातेवाईक घरी जमले होते. नातेवाईकांसाठी मेजवाणीचे आयोजन करण्यात आले होते.

खेळता खेळता मुलगा उकळत्या भाजीत पडला

आचारी मोठ्या कढईत भाजी बनवत होता. तेवढ्यात एक वर्षाचा मुलगा खेळता खेळता तेथे पोहचला आणि उकळत्या भाजीच्या कढईत पडला. यानंतर एकच कल्लोळ माजला. मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून लोकांनी धाव घेत मुलाला कढईतून बाहेर काढले. मुलाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उकळत्या भाजीत पडल्याने मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी मुलाला तपासून मृत घोषित केले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.