AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virar : बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी पोलिसांची मुस्कान मोहिम, 361 बेपत्ता मुले मुली बेपत्ता

वसई विरार भाईंदरमध्ये अनेक कारणामुळे मुलांनी घरं सोडलं आहे. त्यांच्या घरच्यांनी घर का सोडलं याची देखील तक्रार दिली आहे. संबंधित मुलाची माहिती घेतल्याशिवाय पोलिस तपासाला सुरुवात करीत नाही.

Virar : बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी पोलिसांची मुस्कान मोहिम, 361 बेपत्ता मुले मुली बेपत्ता
Virar : बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी पोलिसांची मुस्कान मोहिम, 361 बेपत्ता मुले मुली बेपत्ताImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 12, 2022 | 8:45 AM
Share

विरार – विरार पोलिसांच्याकडून (Virar Police) राबविण्यात येणाऱ्या मुस्कान मोहिम (Muskan Policy) अंतर्गत आत्तापर्यंत अनेक मुला मुलींना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. विरारमध्ये जानेवारी महिन्यांपासून जुलै महिन्यापर्यंत पोलिसांनी मुस्कान मोहिम राबिवली. त्यामध्ये त्यांनी 361 बेपत्ता मुलांपैकी 322 मुलं पालकांच्या स्वाधीन केली आहेत. अद्याप उरलेला मुलांचा पोलिस शोध घेत असून अजून काही दिवस ही मोहीम राबिवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मागच्या जानेवारीपासून (January) मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी पोलिसांनी मुस्कान मोहिम हाती घेतली आहे. आत्तापर्यंत बरीच मुल घरी त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिली असल्याने पोलिसांचं कौतुक केलं जात आहे.

361 बेपत्ता मुलांपैकी 322 मुलं शोधण्यात यश

वसई विरार भाईदर या परिसरातून मुलं गायब होण्याचं प्रमाण अधिक आहे. प्रत्येक मुलासाठी विशेष मोहिम राबिवली जात आहे. त्यामुळे पोलिसांना 361 बेपत्ता मुलांपैकी 322 मुलं शोधण्यात यश आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ही मोहिम राबविली जाते. महाराष्ट्रातील पोलिसांनी ही मोहिम हाती घेतल्यापासून अनेक मुलं त्यांच्या मुळ घरी पुन्हा परतली आहेत. तसेच पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी पोलिसांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रकरणात पोलिसांनी मदत केली आहे. त्यामुळे अनेक प्रकरणात मुलांना शोधण्यात यश आले आहे.

बेपत्ता होण्यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे

वसई विरार भाईंदरमध्ये अनेक कारणामुळे मुलांनी घरं सोडलं आहे. त्यांच्या घरच्यांनी घर का सोडलं याची देखील तक्रार दिली आहे. संबंधित मुलाची माहिती घेतल्याशिवाय पोलिस तपासाला सुरुवात करीत नाही. बेपत्ता होण्यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे, तर मुलांची संख्या कमी आहे. प्रत्येक प्रकरणात वेगळं कारण आहे. अनेकदा आई वडिलांनी रागावल्यामुळे मुले गायब झाली आहेत.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......