AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Suicide : वर्ध्यात प्राध्यापकाची नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही, मात्र 18 जुलैला त्यांचे लग्न असल्याचे समजते.

Wardha Suicide : वर्ध्यात प्राध्यापकाची नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
वर्ध्यात प्राध्यापकाची नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्याImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 14, 2022 | 9:33 PM
Share

वर्धा : नागपूर-अमरावती महामार्गावरील वर्धा नदीपात्रात उडी (Jump) घेऊन एका प्राध्यापकाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. विनोद केशव बागवाले (45) असे आत्महत्या करणाऱ्या प्राध्यापकाचे नाव आहे. विनोद बागवाले हे नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील नबिरा महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक (Professor) म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नदी पात्रात उडी घेतल्याचे नागरिकांना दिसताच पोलिसांना माहिती देण्यात आली. सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने नदी दुभडी भरून वाहत आहे. त्यामुळे अद्याप मृतदेह आढळून आला नाही.

चार दिवसावर लग्न आले असताना उचलले टोकाचे पाऊल

विनोद बागवाले हे नागपूर जिल्ह्याच्या काटोल येथील नबिरा महाविद्यालयात कार्यरत असून गुरुवारी सकाळी ते आपल्या कारने नागपूर-अमरावती महामार्गावरील खंडका नजीकच्या वर्धा नदीपात्राजवळ आले. त्यांनी महामार्गाच्या बाजूला कार उभी करुन नदीत उडी घेतली. ही घटना काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याची माहिती तळेगाव येथील पोलिसांना देताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रात लांबपर्यंत शोध घेतला, पण मृतदेह आढळला नाही. एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यांनी शोधमोहीम सुरु केली असून अद्यापही थांगपत्ता लागला नाही. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही, मात्र 18 जुलैला त्यांचे लग्न असल्याचे समजते. पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Professor commits suicide by jumping into Wardha river)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.