गावी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला गोड बोलून रेल्वे स्थानकाबाहेर आणलं, नंतर अपरहरण करुन दोन दिवस सलग सामूहिक बलात्कार, पुणे हादरलं

महाराष्ट्रात विशेषत: राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात एक संतापजनक आणि किळसवाणी घटना समोर आली आहे. काही नराधमांनी मिळून अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची प्रचंड संतापजनक घटना समोर आली आहे.

गावी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला गोड बोलून रेल्वे स्थानकाबाहेर आणलं, नंतर अपरहरण करुन दोन दिवस सलग सामूहिक बलात्कार, पुणे हादरलं
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 7:29 PM

पुणे : महाराष्ट्रात विशेषत: राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात एक संतापजनक आणि किळसवाणी घटना समोर आली आहे. काही नराधमांनी मिळून अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची प्रचंड संतापजनक घटना समोर आली आहे. या अशा घटनांमुळे या पुरोगामी महाराष्ट्राची नेमकी वाटचाल आता कोणत्या दिशेला होतेय? असा प्रश्न उपस्थित होतोय. महाराष्ट्राची एक वेगळी आणि चांगली अशी ओळख आहे. पण महाराष्ट्राच्या पोटात विशेषत: पुण्यात अशा प्रकारची घटना उघड झाल्याने मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही असे सांगून तिला रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.

दरम्यान रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून तब्बल आठ जणांना अटक केली. या संपूर्ण प्रकरणात आणखीनही काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पीडितेची पोलिसात तक्रार

संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाई त्यांनी आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपींना पोलिसांचा धाक नाही

पुण्यासारख्या जिल्ह्यात या अशाप्रकारच्या घटना घडत असतील तर इतर भागांचं काय? विशेष म्हणजे आरोपींना पोलिसांचा जरा सुद्धा धाक राहिलेला नाही. आरोपी अवघ्या 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करतात त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करतात तोपर्यंत पोलीस प्रशासन नेमकं कुठे गेलं होतं? असा प्रश्न उपस्थित होतोय. आरोपींच्या मनात पोलिसांप्रती असलेली भीती राहिलेली नाही. त्यातूनच या अशा घटना उघडकीस येताना दिसत आहेत, असं मत आता स्थानिकांकडून व्यक्त केलं जात आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा आहे. याप्रकरणाता पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळेल, अशी आशा करुयात.

पुण्यात सराईत बाल गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

विशेष म्हणजे अवघ्या दहा दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड येथून अशीच काहिशी घटना समोर आली होती. दोन सराईत बाल गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीवर वांरवार सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींनी पीडितेवर अत्याचार करताना मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर ते मुलीला तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी द्यायचे. अशाच प्रकारची धमकी देवून त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीवर अनेकदा सामूहिक बलात्कार केला. आरोपींकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने आपल्या कुटुंबियांनी याबाबत तक्रार करु, असं सांगितलं असता आरोपींनी पीडितेला तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता प्रचंड घाबरली होती.

पोलिसांकडून एका आरोपीला बेड्या

पोलिसांनी याप्रकरणी दोन बाल गुन्हेगार आणि एका सज्ञान आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींपैकी एका बाल गुन्हेगाराला ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे आरोपी दोन बाल गुन्हेगारांवर पूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पीडिता आणि तिचे कुटुंबिय आरोपींच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यास घाबरत होते.

हेही वाचा :

घरकाम करणाऱ्या महिलेची दगडाने ठेचून हत्या, कल्याणच्या उच्चभ्रू भागात मृतदेह आढळला

बाप झाला वैरी, आधी 10 वर्षांच्या लेकीला संपवलं, नंतर आणखी टोकाचं पाऊल, अहमदनगरमध्ये खळबळ

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.