AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोनवरुन शिवीगाळ का केली? जाब विचारायला गेलेल्या दोघांची पुण्यात निर्घृण हत्या

या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सर्व आरोपी फरार आहेत. या घटनेमुळे रात्रीपासून पाटस गावामध्ये तणावाचे वातावरण आहे.

फोनवरुन शिवीगाळ का केली? जाब विचारायला गेलेल्या दोघांची पुण्यात निर्घृण हत्या
दौंडमधील मयत तरुण
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 05, 2021 | 3:26 PM
Share

दौंड : फोनवरुन शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोक्यात दगड घालून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात रविवारी ही घटना घडली. या प्रकरणातील आठही आरोपी पसार झाले आहेत. (Pune Daund Two Youngsters killed for asking reason of abusing)

जाब विचारल्याने दोघांची हत्या

शिवम संतोष शितकल (वय 23) गणेश रमेश माखर (वय २३ ) दोघेही रा. पाटस (अंबिकानगर ता. दौंड, जि. पुणे) अशी खून झालेल्या युवकांची नावे आहेत. फोनवरुन शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. दौंड तालुक्यातील पाटस येथील तामखंडा येथील भानोबा मंदिरासमोर रविवारी रात्री ही घटना घडली.

आठही आरोपी फरार

या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सर्व आरोपी फरार आहेत. या घटनेमुळे रात्रीपासून पाटस गावामध्ये तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत, मोहन टुले योगेश शिंदे आणि इतर पाच अनोळखी युवकांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पाटस गावामध्ये रात्रीपासून तणाव निर्माण झाले आहे.

पाण्यावरील वादातून तरुणाला रेल्वेबाहेर फेकले

दुसरीकडे, गोवा एक्स्प्रेसमध्ये पिण्याच्या पाण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आला होता. मनमाडकडून पुण्याकडे जाणारी गोवा एक्स्प्रेस उशिरा धावत असल्यामुळे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रेल्वे दौंड रेल्वे स्टेशनला आली. गजानन राठोड याने नितीन जाधवकडे पिण्यासाठी बाटलीतील पाणी मागितले. मात्र नितीनने पाणी दिले नाही. या किरकोळ कारणावरुन गजानने नितीनच्या कानफटात मारली. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.

धावत्या ट्रेनमधून खाली फेकले

केडगाव स्टेशन येण्याच्या अगोदर गजाननला नितीनने रेल्वे डब्यातील स्वच्छतागृहाजवळ आणले आणि धावत्या गाडीतून त्याला खाली ढकलून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आरोपी नितीन जाधवला पोलिसांनी अटक केली

संबंधित बातम्या :

धावत्या रेल्वेमध्ये बाथरुम 5 वर्षांचा मुलगा अडकला, आरपीएफ जवानांनी सुटका करण्यासाठी काय केलं?

पाण्यावरुन किरकोळ वाद, 33 वर्षीय प्रवाशाचा ट्रेनबाहेर फेकल्याने मृत्यू, पुण्यातील प्रकार

(Pune Daund Two Youngsters killed for asking reason of abusing)

Follow Us
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?