AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किशोर आवारे हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, बापाला मारल्याचा सूड घेतला; माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक

सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आवारे यांची हत्या माजी नगरसेवकाच्या मुलानेच केल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक केली आहे.

किशोर आवारे हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, बापाला मारल्याचा सूड घेतला; माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक
kishor awareImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 14, 2023 | 8:37 AM
Share

पुणे : पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. किशोर यांची हत्या राष्ट्रवादीच्या आमदाराने केल्याचा आरोप किशोरच्या आईने केला होता. या आमदाराचं नावही एफआयआरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांच्या प्रत्यक्ष चौकशीत वेगळंच कारण समोर आलं आहे. किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आवारे यांनी सर्वांसमोर कानाखाली लगावल्याने त्याचा बदला घेण्यासाठी माजी नगरसेवकाच्या मुलाने आवारे यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भर दुपारी हत्या करण्यात आली होती. आधी आवारे यांना गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आवारे यांची हत्या झाल्यानंतर त्यांची हत्या कोणी केली याबाबतचे अनेक कयास वर्तवले जात होते. पण आवारे यांच्या आईने थेट राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावर आरोप केला होतो. एफआयआरमध्ये शेळके यांचं नावही घेतलं होतं. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास केला असता या प्रकरणात नवाच ट्विस्ट समोर आला आहे.

आरोपींनी दिली कबुली

नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आलेलं आहे. अटकेतील आरोपींनीच हत्येमागचं कारण सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. म्हणून गौरव खळदेला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. आवारे हत्याप्रकरणात माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचंही उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

राग मनात धरून हत्या

काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली आहे.

आरोपींना पोलीस कोठडी

दरम्यान, वडगांव मावळ न्यायालयाने अटकेतील चौघांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.