AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील घाटात पंजाबमधील ट्रकचालकाचा कुणी केला खून? 24 तासांच्या आत पोलिसांनी लावला शोध!

Kolhapur Truck Driver Murder Case : कमलजीत हा पाच वर्षांपासून मृत धरमसिंहच्या ओळखीचा होता. अधनंमधनं तो त्याच्यासोबत प्रवास करत असे. दरम्यान, दोघांमध्ये पैशांवरुन वाद झाला होता.

महाराष्ट्रातील घाटात पंजाबमधील ट्रकचालकाचा कुणी केला खून? 24 तासांच्या आत पोलिसांनी लावला शोध!
पंजाबमधील ट्रक चालकाची महाराष्ट्रातील फोंडा घाटात हत्या
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jan 25, 2022 | 11:32 AM
Share

कोल्हापूर : पंजाबमधून स्पिरीट भरुन गोव्याकडे निघालेल्या ट्रकचालकाचा महाराष्ट्रातील फोंडा (Phona Ghat, Maharashtra) घाटात खून करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना चोवीस तासांच्या आतच दिल्लीतून अटक केली आहे. फोंडा घाटात नियोजनबद्धरीत्या ट्रक चालकाचा खून (Punjab Truck Driver Murder Case) करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. शनिवारी ट्रकच्या केबीनमध्ये पुरुषाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी पोस्टमॉर्टेम केल्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचं उघड झालं होतं. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव तरलोकसिंग धरमसिंग असल्याचं समोर आलं होतं. वय वर्ष 54 असलेल्या तरलोकसिंह हे पंजाबमधून गोव्याच्या (Goa) दिशेनं ट्रक घेऊन चालले होते. पण वाटेतच त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी हत्या झाल्याचं कळताच विशेष पथक नेमून 24 तासांच्या आत दोघांना बेड्या ठोकल्यात.

का करण्यात आली हत्या?

ट्रक चालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. यातील संशयित आरोपी कमलजीत हा पाच वर्षांपासून मृत धरमसिंहच्या ओळखीचा होता. अधनंमधनं तो त्याच्यासोबत प्रवास करत असे. दरम्यान, दोघांमध्ये पैशांवरुन वाद झाला होता. धरमसिंग यांच्याकडे असलेल्यी वीस हजार रुपये रोख रक्कम लुटण्याच्या हेतूनं त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आला. यात त्यांचा मृत्यू झाला. तर लोखंडी रॉडनं हत्या केल्यानंतर त्यांच्याकडील 20 हजार रुपयांची रोकड घेऊन दोघांनी पलायन केलं होतं.

कसा लागला आरोपींचा शोध?

पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावंही समोर आली आहेत. यापैकी कमलिजत सिंग हा 53 वर्षांचा असून बलविंदर हा 25 वर्षांचा आहे. या दोघांनी क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे. ट्रक आला कुठून? त्याचा मार्ग काय होता? तसंच ट्रकमधील कागदपत्रांच्या आधारं पोलिसांनी आरोपींची शोध घेण्यास सुरुवात केली. तसंच सीसीटीव्ही फुटेचच्या मदतीनं पोलिसांनी आपली शोध मोहीम सुरु केली होती. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच पोलिसांनी या हत्येप्रकरणी चोवीस तासांच्या आत आरोपींना गजाआड केलंय.

आरोपील रेल्वेनं दिल्लीली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी विमानानं दिल्ली गाठली आणि रेल्वे स्टेशनवरच दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. सापळा रचून पोलिसांनी महाराष्ट्रात पंजाबमधील ट्रक चालकाची हत्या करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

संबंधित बातम्या :

‘आय लव्ह यू पप्पा, काळजी घ्या’ गळफास घेतलेल्या जान्हवीची सुसाईड नोट वाचून वडील हादरले

बर्थडे सेलिब्रेट करायला गेले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! वर्ध्यातील अपघाताचा अंगावर काटा आणणार घटनाक्रम

करणी केल्याची भीती घालायचा, 28 वर्षांचा भोंदूबाबा सुशिक्षांताना लुटायचा! डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली