AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरण, लहान मुलांना जिथे ओलीस ठेवलं, त्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया

Rohit Arya : मुंबईत काल एक खळबळजनक घटना घडली. शूटिंगच्या निमित्ताने मुलांना बोलवून मुलांना ओलीस ठेवण्याचा प्रकार घडला. यावेळी मुलांना वाचवण्यासाठी पोलिसांना स्पेशल ऑपरेशन करावं लागलं. आता जिथे हे सर्व घडलं, त्या स्टुडिओची प्रतिक्रिया आली आहे.

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरण, लहान मुलांना जिथे ओलीस ठेवलं, त्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया
Rohit Arya
| Updated on: Oct 31, 2025 | 11:30 AM
Share

मुंबईच्या पवई परिसरात गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलांना शूटिंगसाठी बोलवून त्यांना बंधक बनवून ठेवण्याचा प्रकार घडला. पवईच्या आरए स्टुडिओमध्ये ही घटना घडली. रोहित आर्या नावाचा व्यक्ती या सगळ्यासाठी जबाबदार आहे. मुंबई पोलिसांनी ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका केली. हे बचाव ऑपरेशन सुरु असताना पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू झाला. या घटनेने मुंबईत पालक वर्गाला हादरवून सोडलय. त्यांच्यामध्ये चिंतेचे वातवरण आहे.

आता हा सर्व प्रकार ज्या RA स्टुडिओमध्ये घडला. त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “काल आमच्या स्टुडिओमध्ये अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडली. अन्य व्यक्तीने केलेल्या बुकिंगदरम्यान हा प्रकार घडलेला आहे. पण मुंबई पोलिसानी तत्काळ केलेल्या कारवाईमुळे मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुंबई पोलिसांचे आभार.आमची टीम पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत असून योग्य ती मदत करत आहे. आम्ही यापुढेही कलाकारांना योग्य ते सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत” असं आरए स्टुडिओने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

पोलिसांना यश आलं नाही

रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी सर्व मुलांच्या पालकांना एक मेसेज पाठवला होता. त्यात त्याने म्हटलं होतं की, आज शूटिंगला वेळ लागणार आहे, त्यामुळे मुलांना दहा मिनिटात भेटून घ्या. त्यानंतर आर्याने हॉलचे दरवाजे बंद करून मुलांना ओलीस ठेवलं आणि काही वेळातच स्वतःचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. पोलीस तब्बल दीड ते पावणेदोन तास त्याच्याशी बोलत होते. त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र यामध्ये काही पोलिसांना यश आलं नाही.

पोलिसांनी हे ऑपरेशन कसं केलं?

तो ऐकत नाही, हे लक्षात आल्यावर पोलिसांनी आर्याला फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवलं. दुसऱ्या बाजुने शिडीचा वापर करून टॉयलेटच्या खिडकीतून स्टुडिओमध्ये प्रवेश केला. पवई पोलीस ठाण्याचे एटीसी सेलचे एपीआय अमोल वाघमारे साध्या वेषात खिडकीतून आत गेले. वाघमारे यांना बघताच रोहित आर्या हा बॅगमधून शस्त्र काढण्याच्या तयारीत होता, त्याचवेळी त्यांनी रोहित आर्यावर गोळी झाडली, या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत