AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य प्रदेशात सिरियल किलरची दहशत, केवळ ‘या’ लोकांनाच बनवायचा आपली शिकार

गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या तावडीतून फार काळ पळून जाऊ शकत नाही. या प्रकरणातही तसेच झाले. ज्या सिरीयल किलरचे कोडे सोडवणे सागर पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते, तो अखेर पोलिसांच्या हाती लागला.

मध्य प्रदेशात सिरियल किलरची दहशत, केवळ 'या' लोकांनाच बनवायचा आपली शिकार
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Sep 02, 2022 | 6:12 PM
Share

मध्य प्रदेश : नैसर्गिक सौंदर्य आणि अभ्यासपूर्ण वातावरणासाठी राज्यात प्रसिद्ध असलेले सागर शहर हत्याकांडामुळे हादरले आहे. गेल्या चार महिन्यांपासून येथे एकामागून एक हत्या (Murder) होत आहेत. या हत्याकांडामुळे सागर अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. विशेष म्हणजे हा किलर केवळ वॉचमनला (Watchmen)च टार्गेट करत होता. या सिरियल किलर (Serial Killer)ला बेड्या ठोकण्यास पोलिसांनी यश आले आहे.

पहिली घटना 2 मे रोजी सागर येथील मक्रोनिया पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वेच्या ओव्हर ब्रिजखाली घडली. येथे बांधकाम सुरू असलेल्या ओव्हरब्रिजची देखरेख करण्यासाठी तैनात असलेल्या वॉचमनला कोणीतरी डोक्यात काठीने मारून निर्घृण हत्या केली होती.

दुसरी घटना 27 ऑगस्ट रोजी कँट परिसरातील भैन्सा गावात घडली. येथे चार महिन्यांपूर्वी माक्रोनिया येथे एका ट्रकच्या गॅरेजमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा अशाच पद्धतीने शिरच्छेद करण्यात आला होता. फरक एवढाच होता की तिथे किलरने हत्यार म्हणून काठीचा वापर केला आणि इथे मोठ्या हातोड्याने डोके ठेचून मारले.

तिसरी घटना 29 ऑगस्ट रोजी शहरातील कला व वाणिज्य महाविद्यालय परिसरात तैनात असलेल्या चौकीदाराची हत्या करण्यात आली होती. कॉलेज कॅम्पसमध्ये बांधलेल्या कँटीनमध्ये चौकीदार झोपला होता आणि याआधी झालेल्या दोन हत्यांप्रमाणेच त्याला झोपलेल्या अवस्थेत मारेकऱ्याने लक्ष्य केले होते.

एक विशेष बाब म्हणजे यावेळी मारेकऱ्याने सोबत आणलेल्या कोणत्याही शस्त्राने त्याचा जीव घेतला नाही, तर त्याला जड दगडाने ठेचून त्याला मारण्यात आले.

चौथी घटना 30 ऑगस्ट रोजी शहरातील मोतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रातोना गावात घडली. एका चौकीदाराची हत्या केली होती. हा चौकीदार रातोना येथे बांधण्यात येत असलेल्या एका बांधकामाधीन इमारतीत तैनात होता आणि त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा तो शांत झोपला होता.

धक्कादायक बाब म्हणजे मारेकऱ्याने सोबत आणलेल्या कोणत्याही विशेष शस्त्राने त्याला लक्ष्यही केले नाही, तर जागीच पडलेल्या फावड्याने त्याच्यावर वार करण्यात आले. जखमी चौकीदाराला रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सागरच्या रुग्णालयातून राजधानी भोपाळला रेफर करण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.

चारही हत्यांमध्ये साम्य होते

गेल्या तीन दिवसांत तीन ते चार महिन्यांत एकूण चार चौकीदारांची रहस्यमयरित्या हत्या करण्यात आली होती. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 60 वर्षीय उत्तम रजक, 60 वर्षीय कल्याण लोधी, 55 वर्षीय शंभू शरण शर्मा आणि 46 वर्षीय मंगल अहिरवार यांचा समावेश आहे.

मृत्युमुखी पडलेल्या या चार जणांचा एकमेकांशी कोणताही संबंध नव्हता किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यही एकमेकांना ओळखत नव्हते. चारही हत्यांमध्ये अनेक गोष्टी अगदी सारख्याच होत्या. यावरुन या हत्या एकाच व्यक्तीने केल्याचे निष्पन्न होत होते.

हत्याकांडात काय होते साम्य

– हत्येचे बळी ठरलेले सर्व लोक चौकीदार म्हणून काम करायचे. – मारेकऱ्याने आपल्या प्रत्येक पीडिताला ते कर्तव्यावर असताना आणि झोपलेले असतानाच लक्ष्य केले, म्हणजेच सर्व हत्या रात्रीच्या वेळीच झाल्या. – डोक्याला मारहाण करून किंवा डोके ठेचून सर्व हत्या करण्यात आल्या. – सोबत आणलेल्या कोणत्याही शस्त्राऐवजी खुनी घटनास्थळी पडलेल्या वस्तूंना शस्त्रे बनवत होता. – मृत्युमुखी पडलेल्या सर्वांचे वय 50 च्या आसपास होते. – खुनाच्या सर्व ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर पेट्रोल पंप होता.

असा पकडला आरोपी

गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या तावडीतून फार काळ पळून जाऊ शकत नाही. या प्रकरणातही तसेच झाले. ज्या सिरीयल किलरचे कोडे सोडवणे सागर पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते, तो अखेर पोलिसांच्या हाती लागला.

मृत वॉचमनच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करत असताना पोलीस राजधानी भोपाळीत पोहोचले आणि तेथून मारेकऱ्याला पोलिसांनी पकडला. शिवप्रसाद असे आरोपीचे नाव आहे. तो सागर जिल्ह्यातील केसली येथील रहिवासी आहे.

शिवप्रसाद हत्या केलेल्या तिसऱ्या चौकीदाराचा फोन घेऊन फिरत होता. त्याचा माग काढत असताना पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याला पकडण्यात आले. आता पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

हत्येमागे कोणताही विशिष्ट हेतू नाही

आतापर्यंतच्या तपासातील या सर्व बाबी पाहता या सर्व खुनामागे कोणताही विशेष हेतू नसल्याचे स्पष्ट होते. म्हणजे, हत्या करण्यात आलेल्या चौकीदाराचे कुठले वैर होते,ना लूटमारीचा हेतू. अशा परिस्थितीत रात्रीच्या अंधारात अशाच प्रकारे चौकीदारांना मारणारा खुनी मानसिक रुग्ण म्हणजेच मनोरुग्ण असण्याची दाट शक्यता असते. (Serial killer terror in Madhya Pradesh, accused arrested through CCTV and mobile location)

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड