AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon – नदीत असलेली जनावरे बाहेर काढताना तरुण पाण्यात बुडाला, पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू

ग्रामीण भागात अनेकदा अशा घडल्याचे आपण पाहतो. काल रात्री घडलेली दुर्घटना लोकांच्या जीवारी लागली आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon -  नदीत असलेली जनावरे बाहेर काढताना तरुण पाण्यात बुडाला, पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू
अहमदाबादमधील तरुणाच्या हत्येचे गूढ उकललेImage Credit source: t v 9
| Updated on: Jul 31, 2022 | 11:09 AM
Share

जळगाव – राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे सगळ्या नद्यांना अधिक पाणी आहे. त्याचबरोबर उशिरा सुरु झालेल्या पावसाने जुलै महिन्यात धरणे भरली आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कायम वाढ आहे. जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) एक तरुण जनावरे चारायला गेला होता. घरी येताना काही जनावरे आतमध्ये गेलेली बाहेर येत नव्हती. ती काढण्यासाठी तरुणाने प्रयत्न केले, परंतु काही केल्याने जनावरे बाहेर येत नसल्याने त्यांने नदीच्या (River) काठावर बसून प्रयत्न केले. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो नदीत कोसळला. त्यावेळी तिथं त्या तरुणासोबत त्याचा चुलत भाऊ देखील होता. त्याने आरडाओरड केली पण तो कुठेच दिसून आला नाही. काहीवेळाने तरूणाचा मृतदेह (deadbody) पाण्यात तरंगू लागला.

नदीच्या पाण्यात बुडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगांव जामोद तालुक्यातील मडाखेड येथील सुपेश खंडेराव या 17 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घटना घडली आहे. यामुळे मडाखेड गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक सूपेश हा आपल्या चुलत भावासोबत नदी जवळील गायरान जमिनीवर आपली जनावरे चरायला घेऊन गेला होता. सायंकाळी जनावरे पाणी पिण्यासाठी नदीत गेले असता त्यातील गाय खोल पाण्यात उतरली. यावेळी सुपेश गायीला हकालण्यासाठी नदी काठावर गेला असता त्याचा पाय घसरला. तो नदीतील खोल पाण्यात पडला. शेजारील शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिला असता आरडाओरड केली. तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी नदीकडे धाव घेत सुपेषला पाण्यात शोधले. तो लवकर सापडला नाही. काहीवेळाने सूपेष पाण्यावर तरंगताना दिसला असता त्याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जळगांव जामोद पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत्यू लोकांच्या जीवारी लागला

ग्रामीण भागात अनेकदा अशा घडल्याचे आपण पाहतो. काल रात्री घडलेली दुर्घटना लोकांच्या जीवारी लागली आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर जळगांव जामोद पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोहतो येत नसल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.