AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉलेजच्या होस्टेलमध्ये अंघोळ करणाऱ्या मुलींचं, मुलींच्याच दुसऱ्या ग्रुपकडून व्हीडिओ चित्रण, मुलांना व्हीडिओ शेअर

या प्रकरणात बाथरुममध्ये कॅमेरे लपवून मुलींचे अंघोळीचे व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या तीन मुलींच्या विरोधात आणि महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

कॉलेजच्या होस्टेलमध्ये अंघोळ करणाऱ्या मुलींचं, मुलींच्याच दुसऱ्या ग्रुपकडून व्हीडिओ चित्रण, मुलांना व्हीडिओ शेअर
cctvImage Credit source: socialmedia
| Updated on: Jul 26, 2023 | 10:20 PM
Share

कर्नाटक | 26 जुलै 2023 : कर्नाटक राज्यातील उडुपी शहरात एका नर्सिंग कॉलेजातील विद्यार्थींनी आपल्याच मैत्रिणींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावून चित्रित केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या विद्यार्थींनी हा व्हिडीओ त्यांच्या मित्रांना शेअर केला. त्यानंतर त्यांनी हे व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी तीन विद्यार्थींनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उडुपी शहरातील अंबालपाडी येथील नेत्र ज्योती महाविद्यालयात बुधवारी तीन विद्यार्थींनी आपल्याच मैत्रीणींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ कॅमेरे लावून चित्रित केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील तीन विद्यार्थींनी हे आपल्याच सहकारी मैत्रीणींचे व्हिडीओ त्यांच्या मित्रांना शेअर केले. त्या मित्रांनी हे व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल केल्यानंतर खळबळ उडाली आहे. टॉयलेटमध्ये विद्यार्थींनीनी कॅमेरा लपवून ठेवला होता. त्यानंतर हे व्हिडीओ विद्यार्थीनींनी आपल्या मित्रांना दिले. त्यांनी हे व्हिडीओ त्यानंतर समाजमाध्यमात पसरवल्याचा आरोप होत आहे.  पोलिसांनी या प्रकरणात भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थींनीच्या दोन गटात भांडण

या प्रकरणात बाथरुममध्ये कॅमेरे लपवून मुलींचे अंघोळीचे व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या तीन मुलींच्या विरोधात आणि महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात आयपीसी कलम 509, 204, 175, 34 आणि आयटी कायदा कलम 66 ( ई ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महाविद्यालयातील व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या मुली आणि पीडीत मुलींमध्ये जोरदार भांडण झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.