AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्खा उसाचा ट्रक अंगावर पलटला, चार कामगार जागीच ठार; छत्रपती संभाजीनगरावर शोककळा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर घाटात भीषण अपघात झाला. उसाने भरलेला ट्रक पलटल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला, तर तेरा जण जखमी झाले. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

अख्खा उसाचा ट्रक अंगावर पलटला, चार कामगार जागीच ठार; छत्रपती संभाजीनगरावर शोककळा
उसाचा लोड अंगावर आला, चौघांचा मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 10, 2025 | 1:52 PM
Share

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. अख्खा उसाचा ट्रक अंगावर पलटल्याने उसाखाली दबून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर घाटात हा भीषण अपघात झाला. त्यामुळे संपूर्ण संभाजीनगरवर शोककळा पसरली आहे. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

कन्नड पिशोर घाटात हा अपघात झाला. मध्यरात्री 12 ते 1च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. उसाने भरलेल्या या ट्रकमधून एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते. पण घाटात ट्रक येताच अचानक पलटी झाला. त्यामुळे अख्खा उसाचा लोड चार कामगारांच्या अंगावर आला. त्यामुळे हे कामगार जागीच ठार झाले. तर 13 मजुरांचे थोडक्यात प्राण वाचले.

रडारड ऐकून धावले

अपघात झाल्यानंतर मजुरांनी एकच आरडाओरड सुरू केली. परिसरात रडारड सुरू झाली. रडारडीचा आवाज ऐकून गावातील लोक घाटात धावतपळत गेले आणि त्यांनी मजुरांना तात्काळ बाहेर काढण्यास सुरुवात केली. रात्रीच्या अंधारामुळे डेड बॉडी बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. अपघातामुळे हे कामगार रस्त्यावर कोसळले. त्यांच्यासोबतच उसाचे लोडही खाली आले आणि कामगारांच्या अंगावर आदळले. त्यामुळे चार जण जागीच ठार झाले तर इतर 13 जण जखमी झाले. यातील काहींना किरकोळ मार लागला आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

असा झाला अपघात

रात्रीच्या अंधारात पिशोर घाटातून हा ट्रक चालला होता. उसामुळे ट्रकवर लोड अधिक होता. त्यामुळे ट्रक धीम्यागतीनेच सुरू होता. पण कन्नड घाटात वळण घेत असतानाच उसाचा ट्रक अचानक पलटी झाला. त्यामुळे उसासह कामगार रस्त्यावर पडले आणि उसाखाली कामगार दबले गेले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मध्यरात्रीच या कामगारांची डेडबॉडी बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. मृत झालेले चारही कामगार हे सातकुंड गावातील आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे कन्नड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....