AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरासमोर खेळता खेळता अचानक गायब झाली मुले, दोघा भावंडांसोबत नक्की काय घडले?

गुंजाळ यांची दोन्ही मुले बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आली. त्यानंतर ती घराबाहेर खेळत होती. काही वेळाने आई मुलांना पहायला गेली असता मुले घराबाहेर दिसली नाहीत.

घरासमोर खेळता खेळता अचानक गायब झाली मुले, दोघा भावंडांसोबत नक्की काय घडले?
घराबाहेर खेळत असताना दोन मुले अचानक बेपत्ताImage Credit source: TV9
| Updated on: Feb 17, 2023 | 3:21 PM
Share

सिन्नर / उमेश पारीक (प्रतिनिधी) : घराबाहेर खेळत असतानाचा दोन भावंडे अचानक गायब झाल्याची धक्कादाक घटना सिन्नर तालुक्यातील कानडी मळा परिसरात घडली आहे. मुलं घराबाहेर दिसली नाहीत म्हणून आई-वडिलांनी त्यांचा सर्वत्र शोध सुरु केला. मात्र मुलांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. अखेर रात्री उशिरा सिन्नर पोलिसात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. दोन दिवस झाले तरी मुलांचा अद्याप शोध लागला नाही. मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. दोन मुले अचानक गायब झाल्याने आई-वडिलांना दुःख अनावर झाले आहे.

आई-वडिल मोलमजुरीचे काम करतात

सिन्नर येथील कानडी मळा परिसरात सरला गुंजाळ आणि सदाशिव गुंजाळ हे दोघे आपल्या 12 वर्षाच्या आणि 11 वर्षाच्या दोन मुलांसह राहतात. दोघेही पती मोलमजुरीचे काम करुन कुटुंबाची उपजिवीका करतात.

घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली

गुंजाळ यांची दोन्ही मुले बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आली. त्यानंतर ती घराबाहेर खेळत होती. काही वेळाने आई मुलांना पहायला गेली असता मुले घराबाहेर दिसली नाहीत.

सिन्नर पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार

आई आणि वडिलांनी आजूबाजूला मुलांचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत बराच शोध घेऊनही मुलांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर आई-वडिलांनी सिन्नर पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...