लग्न करणार की नाही बोल, प्रियकराच्या लग्नात प्रेयसीचा गोंधळ, धसक्याने मामाचा मृत्यू

| Updated on: Nov 18, 2021 | 4:00 PM

वरात ऐन रंगात आली असताना एक तरुणी तिथे पोहोचली, तिने वराशी आपले प्रेमसंबंध असल्याचा दावा केला. आपण दोघेही हॉटेलमध्ये एकत्र काम करायचो. तेव्हा आमची भेट झाली, ओळखीचं रुपांतर पुढे मैत्री आणि प्रेमात झालं. तरुणाने आपल्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता तो दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे, अशी आपबिती तरुणीने मांडली.

लग्न करणार की नाही बोल, प्रियकराच्या लग्नात प्रेयसीचा गोंधळ, धसक्याने मामाचा मृत्यू
मॅट्रिमोनी साईट्सवर तब्बल 41 महिलांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातील शाहगंज भागात मंगळवारी रात्री एक विचित्र घटना घडली. फतेहपूर सिक्री येथून निघालेल्या लग्नाच्या वरातीत अचानक एक तरुणी येऊन धडकली. तिने आपण नवरदेवाची गर्लफ्रेण्ड असल्याचा दावा केला. तसंच त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत मोठा गोंधळ घातला. नवरदेवाने लग्न करण्यास सपशेल नकार दिल्यानंतर तरुणीने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही जणांनी तिला अडवले. मात्र या गोंधळानंतर वधूच्या मामाची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री येथून मंगळवारी रात्री आग्रा शहरातील शहागंज पोलीस स्टेशन परिसरात ही लग्नाची वरात आली होती. वरात ऐन रंगात आली असताना ताजगंज भागात राहणारी एक तरुणी तिथे पोहोचली, तिने वराशी आपले प्रेमसंबंध असल्याचा दावा केला. हे ऐकून उपस्थितांमध्ये कुजबूज रंगली. “आपण दोघेही हॉटेलमध्ये एकत्र काम करायचो. तेव्हा आमची भेट झाली, ओळखीचं रुपांतर पुढे मैत्री आणि प्रेमात झालं. तरुणाने आपल्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता तो दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे” अशी आपबिती तरुणीने मांडली.

तरुणीचा विष खाण्याचा प्रयत्न

प्रेयसीच्या दाव्यानंतर मोठा गोंधळ उडाला. याबाबत वधू पक्षाच्या लोकांनाही माहिती मिळाली. त्यामुळे लग्न समारंभात एकच हलकल्लोळ झाला. तरुणीने पोलिसांनाही सोबत आणले होते. असे म्हटले जाते की, प्रेयसीने नवरदेवाला निक्षून विचारले, की तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही. यावर प्रियकराने लग्न करण्यास नकार दिला. हे ऐकून मुलीने विष खाण्याचा प्रयत्न केला. तिला उपस्थित नागरिकांनी कसेबसे रोखले. मात्र रात्री एक वाजेपर्यंत हा गोंधळ सुरूच होता.

मामाने धसका घेतला

या गोंधळात वधूच्या मामाची प्रकृती बिघडली. ज्या तरुणाच्या गळ्यात आपली भाची वरमाला घालणार आहे, त्याचे प्रताप ऐकून मामाला भोवळ आली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वधू पक्षाने सांगितले की, त्यांना बसलेला धक्का इतका जबर होता, की त्यांना आपला जीव गमवावा लागला.

दोन्ही पक्षात तडजोड झाल्याची चर्चा

त्याचवेळी बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत वधू आणि वर पक्षात समेट घडवण्यासाठी वाटाघाटी सुरु होत्या. त्यानंतर दोघांमध्ये तडजोड झाली. यासंदर्भात सीओ लोहमंडी सौरभ सिंह यांनी सांगितले की पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पृथ्वीनाथ चौकीचे प्रभारी घटनास्थळी पाठवण्यात आले होते. तक्रार आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

संबंधित बातम्या :

पहिली बायको सोडून गेली, दुसरीचा गळा दाबून खून, लग्नानंतर साडेचार महिन्यांतच असं काय घडलं?

मशिनमध्ये स्कार्फ अडकला, पुण्यात 21 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू

फेसबुकवरील मैत्री महागात, नगरमध्ये सरकारी कर्मचाऱ्याची 2 लाख 30 हजारांना फसवणूक