AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागली? सगळेच हळहळले, पाच वर्षांपूर्वी सर्वांशी भांडून Love Marriage

आसपास शेजारी चौकशी केल्यानंतर दोघे सुखी, आनंदी जीवन जगत असल्याच समजलं. मग, आता पोलीसही हैराण आहेत. त्यांनी असं पाऊल उचललं की कोणी हे घडवून आणलं?

सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागली? सगळेच हळहळले, पाच वर्षांपूर्वी सर्वांशी भांडून Love Marriage
Couple
| Updated on: Jan 21, 2025 | 2:43 PM
Share

एका जोडप्याने विष प्राशन केलं. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बराचकाळ प्रेमसंबंधात राहिल्यानंतर दोघांनी पाच वर्षांपूर्वी लग्न केलं. या लग्नाला दोघांच्या घरच्यांनी विरोध केला होता. प्रेमाखातर दोघांनी घर सोडलं. पनकी येथे दोघे राहत होते. आता दोघांच्या एकत्र मृत्यूच्या बातमीने धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हे प्रकरण आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, आतापर्यंतच्या तपासात दोघांच्या मृत्यूच ठोस कारण समोर आलेलं नाही. आसपास शेजारी चौकशी केल्यानंतर दोघे सुखी, आनंदी जीवन जगत असल्याच समजलं. मग, आता पोलीसही हैराण आहेत की, दोघांनी जीवन का संपवलं?. कानपूरच्या नौबस्ता येथे राहणारी सलोनी सचान आणि अलकेश सचान परस्परांवर प्रेम करायचे. दोघांना परस्परांशी लग्न करायचं होतं. पण कुटुंबिय दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते.

फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास

अशा परिस्थितीत दोघांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं. दोघे पनकीच्या पतरसा गावात भाड्याच्या घरात राहू लागले. पोलिसांनुसार, दोघे परस्पर सहमतीने आनंदात राहत होते. रविवारी दोघांनी विष प्राशन केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले व दोघांना रुग्णालयात हलवलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोघांना मृत घोषित केलं. ही घटना घडल्यानंतर त्यामागची कारणं शोधण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने चौकशी सुरु केली आहे.

पाच वर्षात असं काय झालं?

दोघांनी एकत्र राहण्यासाठी कुटुंबाची साथ सोडलेली. भांडण केलेलं, असं पोलीसच नाही, कुटुंबिय सुद्धा विचार करत आहेत. पाच वर्षातच असं काय झालं, दोघांना इतकं मोठ पाऊल उचलावं लागलं. पोलिसांना घटनास्थळी कुठलीही सुसाइडची चिठ्ठी मिळालेली नाही. त्यामुळे या दोघांनी स्वत:हून विष प्राशन केलं की, कोणी यांना विष दिलं, ते अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?