AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव गाव जिथे पाच दिवस महिला परिधान करत नाहीत कपडे, कारण ऐकून…

भारतातील एकमेव गाव जिथे महिला 5 दिवस परिधान करत नाहीत कपडे. काय आहे यामागे नेमकं कारण?

भारतातील एकमेव गाव जिथे पाच दिवस महिला परिधान करत नाहीत कपडे, कारण ऐकून...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 04, 2026 | 5:26 PM
Share

भारत हा देश विविध संस्कृती, परंपरा आणि श्रद्धांसाठी ओळखला जातो. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा दिसून येतात. अशाच एका अनोख्या परंपरेची चर्चा हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पिनी गावाशी संबंधित आहे. या गावात श्रावण महिन्यात पाच दिवस विशेष धार्मिक विधी पार पडतात. ज्याबाबत स्थानिकांमध्ये मोठी श्रद्धा आहे.

हिमाचल प्रदेश राज्यातील कुल्लू जिल्ह्यामधील पिनी गावात दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या काळात पाच दिवसांचा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो. स्थानिकांच्या मते हा उत्सव त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

या कालावधीत गावातील विवाहित महिला काही विशिष्ट धार्मिक नियमांचे पालन करतात. त्या पाच दिवस घरातच राहतात. एकांत पाळतात आणि बाहेर जाणे टाळतात. पती-पत्नी एकमेकांपासून दूर राहतात. ही प्रथा अत्यंत कडक नियमांनुसार पार पाडली जाते.

पुरुषांसाठीही कडक नियम

या उत्सवाच्या काळात गावातील पुरुषांवरही काही बंधने लागू असतात. या काळात त्यांना मद्यपान, मांसाहार किंवा इतर कोणतेही अपवित्र मानले जाणारे कृत्य करण्यास मनाई असते. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार, नियमांचे उल्लंघन केल्यास गावावर संकट येऊ शकते. म्हणूनच संपूर्ण गाव एकत्र येऊन श्रद्धेने आणि शिस्तीने ही परंपरा पाळतो. गावकऱ्यांच्या मते, या नियमांमुळे गावाचे रक्षण होते आणि देवतेची कृपा कायम राहते.

या परंपरेमागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. स्थानिक मान्यतेनुसार, प्राचीन काळी एका राक्षसाने गावात वारंवार हल्ले केले होते. त्यावेळी गावाचे संरक्षक देवता ‘लाहु घोंडा’ यांनी त्या राक्षसाचा वध करून गावाचे रक्षण केले. त्या घटनेच्या स्मरणार्थ आणि देवतेच्या सन्मानार्थ ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

आजच्या आधुनिक काळात ही प्रथा अनेकांना वेगळी किंवा आश्चर्यकारक वाटू शकते. मात्र पिनी गावातील लोकांसाठी ही त्यांची ओळख, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे.

Disclaimer : वरील माहिती स्थानिक मान्यता आणि उपलब्ध कथांवर आधारित आहे. यामधील श्रद्धा किंवा दाव्यांची स्वतंत्र पडताळणी केलेली नाही. कोणतीही परंपरा किंवा माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.