AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव गाव जिथे पाच दिवस महिला परिधान करत नाहीत कपडे, कारण ऐकून…

भारतातील एकमेव गाव जिथे महिला 5 दिवस परिधान करत नाहीत कपडे. काय आहे यामागे नेमकं कारण?

भारतातील एकमेव गाव जिथे पाच दिवस महिला परिधान करत नाहीत कपडे, कारण ऐकून...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 04, 2026 | 5:26 PM
Share

भारत हा देश विविध संस्कृती, परंपरा आणि श्रद्धांसाठी ओळखला जातो. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा दिसून येतात. अशाच एका अनोख्या परंपरेची चर्चा हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पिनी गावाशी संबंधित आहे. या गावात श्रावण महिन्यात पाच दिवस विशेष धार्मिक विधी पार पडतात. ज्याबाबत स्थानिकांमध्ये मोठी श्रद्धा आहे.

हिमाचल प्रदेश राज्यातील कुल्लू जिल्ह्यामधील पिनी गावात दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या काळात पाच दिवसांचा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो. स्थानिकांच्या मते हा उत्सव त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

या कालावधीत गावातील विवाहित महिला काही विशिष्ट धार्मिक नियमांचे पालन करतात. त्या पाच दिवस घरातच राहतात. एकांत पाळतात आणि बाहेर जाणे टाळतात. पती-पत्नी एकमेकांपासून दूर राहतात. ही प्रथा अत्यंत कडक नियमांनुसार पार पाडली जाते.

पुरुषांसाठीही कडक नियम

या उत्सवाच्या काळात गावातील पुरुषांवरही काही बंधने लागू असतात. या काळात त्यांना मद्यपान, मांसाहार किंवा इतर कोणतेही अपवित्र मानले जाणारे कृत्य करण्यास मनाई असते. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार, नियमांचे उल्लंघन केल्यास गावावर संकट येऊ शकते. म्हणूनच संपूर्ण गाव एकत्र येऊन श्रद्धेने आणि शिस्तीने ही परंपरा पाळतो. गावकऱ्यांच्या मते, या नियमांमुळे गावाचे रक्षण होते आणि देवतेची कृपा कायम राहते.

या परंपरेमागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. स्थानिक मान्यतेनुसार, प्राचीन काळी एका राक्षसाने गावात वारंवार हल्ले केले होते. त्यावेळी गावाचे संरक्षक देवता ‘लाहु घोंडा’ यांनी त्या राक्षसाचा वध करून गावाचे रक्षण केले. त्या घटनेच्या स्मरणार्थ आणि देवतेच्या सन्मानार्थ ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

आजच्या आधुनिक काळात ही प्रथा अनेकांना वेगळी किंवा आश्चर्यकारक वाटू शकते. मात्र पिनी गावातील लोकांसाठी ही त्यांची ओळख, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे.

Disclaimer : वरील माहिती स्थानिक मान्यता आणि उपलब्ध कथांवर आधारित आहे. यामधील श्रद्धा किंवा दाव्यांची स्वतंत्र पडताळणी केलेली नाही. कोणतीही परंपरा किंवा माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Follow Us
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.