AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव गाव जिथे पाच दिवस महिला परिधान करत नाहीत कपडे, कारण ऐकून…

भारतातील एकमेव गाव जिथे महिला 5 दिवस परिधान करत नाहीत कपडे. काय आहे यामागे नेमकं कारण?

भारतातील एकमेव गाव जिथे पाच दिवस महिला परिधान करत नाहीत कपडे, कारण ऐकून...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 04, 2026 | 5:26 PM
Share

भारत हा देश विविध संस्कृती, परंपरा आणि श्रद्धांसाठी ओळखला जातो. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा दिसून येतात. अशाच एका अनोख्या परंपरेची चर्चा हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पिनी गावाशी संबंधित आहे. या गावात श्रावण महिन्यात पाच दिवस विशेष धार्मिक विधी पार पडतात. ज्याबाबत स्थानिकांमध्ये मोठी श्रद्धा आहे.

हिमाचल प्रदेश राज्यातील कुल्लू जिल्ह्यामधील पिनी गावात दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या काळात पाच दिवसांचा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो. स्थानिकांच्या मते हा उत्सव त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

या कालावधीत गावातील विवाहित महिला काही विशिष्ट धार्मिक नियमांचे पालन करतात. त्या पाच दिवस घरातच राहतात. एकांत पाळतात आणि बाहेर जाणे टाळतात. पती-पत्नी एकमेकांपासून दूर राहतात. ही प्रथा अत्यंत कडक नियमांनुसार पार पाडली जाते.

पुरुषांसाठीही कडक नियम

या उत्सवाच्या काळात गावातील पुरुषांवरही काही बंधने लागू असतात. या काळात त्यांना मद्यपान, मांसाहार किंवा इतर कोणतेही अपवित्र मानले जाणारे कृत्य करण्यास मनाई असते. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार, नियमांचे उल्लंघन केल्यास गावावर संकट येऊ शकते. म्हणूनच संपूर्ण गाव एकत्र येऊन श्रद्धेने आणि शिस्तीने ही परंपरा पाळतो. गावकऱ्यांच्या मते, या नियमांमुळे गावाचे रक्षण होते आणि देवतेची कृपा कायम राहते.

या परंपरेमागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. स्थानिक मान्यतेनुसार, प्राचीन काळी एका राक्षसाने गावात वारंवार हल्ले केले होते. त्यावेळी गावाचे संरक्षक देवता ‘लाहु घोंडा’ यांनी त्या राक्षसाचा वध करून गावाचे रक्षण केले. त्या घटनेच्या स्मरणार्थ आणि देवतेच्या सन्मानार्थ ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

आजच्या आधुनिक काळात ही प्रथा अनेकांना वेगळी किंवा आश्चर्यकारक वाटू शकते. मात्र पिनी गावातील लोकांसाठी ही त्यांची ओळख, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे.

Disclaimer : वरील माहिती स्थानिक मान्यता आणि उपलब्ध कथांवर आधारित आहे. यामधील श्रद्धा किंवा दाव्यांची स्वतंत्र पडताळणी केलेली नाही. कोणतीही परंपरा किंवा माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक