AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमीसोबत पळून गेली, १० वर्षांनी पुन्हा आली… तिला पाहून पतीची प्रतिक्रिया पाहण्यासाठी, घेतला मोठा निर्णय

गाझीपूरच्या शादियाबादमध्ये एका एक्स पतीने आपल्या पूर्व पत्नीची फावड्याने हत्या केली. दहा वर्षांपूर्वी त्या महिलेने आपल्या पतीला सोडून दुसरे लग्न केले होते. एक आठवड्यापूर्वी गावी परतलेल्या महिलेने एक्स पतीसोबत राहण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिची हत्या केली.

प्रेमीसोबत पळून गेली, १० वर्षांनी पुन्हा आली... तिला पाहून पतीची प्रतिक्रिया पाहण्यासाठी, घेतला मोठा निर्णय
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 25, 2025 | 7:02 PM
Share

उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातील शादियाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने फावड्याने हल्ला करून एका महिलेची हत्या केली. सुमारे 10 वर्षांपूर्वी तिने आपल्या पतीला सोडून गावातीलच एका तरुणाशी लग्न केले आणि त्याच्यासोबत दिल्लीत राहायला गेली. मात्र, एक आठवड्यापूर्वी ती गावी परतली आणि याचवेळी तिच्या पूर्व पतीने तिला पाहिले आणि पुन्हा एकत्र राहण्याची विनंती केली. परंतु, महिलेने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने फावड्याने हल्ला करून तिला ठार केले. आरोपी पतीच्या अटकेनंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.

गाव हादरुन टाकणारी घटना

गाझीपूरच्या शादियाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरदानपूर गावात बुधवारी संध्याकाळी खळबळ उडाली. एक्स पतीने एका महिलेवर अचानक फावड्याने हल्ला केला आणि तिचा मृत्यू होईपर्यंत तिला मारहाण केली. यावेळी महिलेची जाव तिला वाचवण्यासाठी धावली, तेव्हा तिच्यावरही हल्ला झाला, पण ती बचावली. मात्र, तिलाही यात जखमा झाल्या आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि आरोपीचा शोध सुरू केला.

वाचा: फक्त ऑनलाईन पेमेंट करायचा, QR Code स्कॅन करायचा अन् दुकानदार… असं काय घडायचं? कसा बनला तो श्रीमंत?

10 वर्षांपूर्वी झाले होते लग्न

मृत महिला वंदनाचे सुमारे 10 वर्षांपूर्वी जयप्रकाशशी लग्न झाले होते आणि त्यांना एक मूलही होते. पण काही काळानंतर ती गावातीलच शैलेंद्र रामच्या प्रेमात पडली. त्यानंतर एकत्र जगण्याच्या आणि मरण्याच्या शपथा घेत तिने आपल्या मुलांना सोडून शैलेंद्रसोबत लग्न केले. लग्नानंतर ती आणि तिचा प्रियकर दोघेही दिल्लीत गेले. दिल्लीतच ती गेल्या अनेक वर्षांपासून राहत होती आणि याकाळात तिला तीन मुले झाली. मागील आठवड्यापासून ती गावी आली होती आणि आपल्या जावेसोबत शेतात जनावरांसाठी चारा घ्यायला गेली होती. तेव्हाच तिच्या एक्स पतीने याचा फायदा घेतला.

एक्स पतीने केली हत्या

पोलिसांनी एका दिवसापूर्वी तिचा एक्स पती जयप्रकाश राम याला अटक केली आणि त्याची चौकशी केली. त्याने सांगितले की, वंदना त्याच्या मुलांना सोडून शैलेंद्रसोबत दिल्लीत राहायला गेली होती, ज्यामुळे तो कुठेही जाऊ शकत नव्हता. याकाळात त्याने दुसरे लग्न केले, पण काही कारणास्तव दुसरी पत्नीही निघून गेली. त्यानंतर त्याने तिसरे लग्न केले, पण तिसऱ्या पत्नीचा काही महिन्यांपूर्वी आजाराने मृत्यू झाला. जेव्हा त्याने आपली पहिली पत्नी वंदनाला गावात पाहिले, तेव्हा त्याने मुलांचा समजावले आणि पुन्हा एकत्र राहण्याची विनंती केली. वंदनाने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिल्याने संतापलेल्या जयप्रकाशने तिला ठार केले. शादियाबाद पोलिसांनी आरोपी जयप्रकाश राम याला गुरैनी पुलियाजवळ अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली आहे.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.