AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्याचा बंदोबस्त कर, नाहीतर विष घेईन… 12 वर्षांनी मोठ्या प्रेयसीचा अजब हट्ट, मग सुरू झाला रक्तरंजित खेळ

काही दिवसांपूर्वी, वीरपालने घरी दोघांनाही को त्या स्थितीत पाहिले. त्याने सुनीताला रागाच्या भरात मारहाण केली. त्यानंतर सुनीताने अंशुला सांगितले की... काय म्हणाली ती ?

नवऱ्याचा बंदोबस्त कर, नाहीतर विष घेईन... 12 वर्षांनी मोठ्या प्रेयसीचा अजब हट्ट, मग सुरू झाला रक्तरंजित खेळ
क्राईम न्यूज
| Updated on: Oct 15, 2025 | 1:14 PM
Share

प्रेमात माणसं काहीहीह करू शकतात, जीव देऊ शकतात आणि एखाद्याचा जीव घेऊ शकतात. अशा अनेक घटना गेल्या काही काळात उघडकीस आल्या असतानाच आता मुरादाबादच्या बिलारी पोलीस स्टेशन परिसरातील अलेहदादपूर देवा नागला गावातही धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या गावात वीरपाल नावाच्या शेतकऱ्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी कसून तपास केला असता आणखीच भयानक सत्य समोर आलं. मृताची पत्नी सुनीता हिचने तिचा प्रियकर अंशु सोबत मिळून तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचला होता. पोलिसांनी दोघांनाही अटक करून संपूर्ण कट उघड केला. आरोपी महिलेला पाच मुले आहेत आणि ती तिच्या प्रियकरापेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे.

चौकशीदरम्यान, सुनीताने गुन्हा कबूल केला. तिने सांगितलं की ती आणि प्रियकर अंशूची शेजारी-शेजारी शेती आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी, अंशूने भात लागवडीच्या हंगामात तिच्या शेताला भेट दिली होती आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि त्यांचं प्रेम जडलं. सुनीताने सांगितलं, की ती तिचा नवरा वीरपालला दारू पाजल्यानंतर शेतावर पाठवत असे आणि त्याच वेळी ती तिचा प्रियकर अंशुला घरी बोलावत असे.

दोघांना एकत्र पाहिलं अन्…

काही दिवसांपूर्वी, वीरपालने घरी दोघांनाही को त्या स्थितीत पाहिले. त्याने सुनीताला रागाच्या भरात मारहाण केली. त्यानंतर सुनीताने अंशुला सांगितले की जर तिने तिच्या पतीला मार्गातून हटवलं नाही तर ती विष पिऊन आत्महत्या करेल. मग त्यांनी त्याला मारण्याचा कट रचला.

शेतात आखला भयानक कट

2 ऑक्टोबर रोजी, भात मळणी करताना, वीरपालने अंशु आणि सुनीता यांना एकत्र पाहिले आणि त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर, दोघांनी वीरपालला संपवण्याचा निर्णय घेतला. 13 ऑक्टोबरच्या रात्री वीरपाल रात्री शेतात गेला होता, तेव्हा सुनीताच्या इशाऱ्यावरून अंशुही त्याच्यामागोमाग गेला आणि त्याने गळा दाबून वीरपालचा खून केला.

आरोपी अंशूने पोलिसांना सांगितले की, भात लावणी करताना त्याची सुनिताशी भेट झाली आणि त्यानंतर एकमेकांवर प्रेम जडलं. सुनीताने त्याला सांगितलं की “तू अजून लग्न केलेले नाहीस. मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहीन, पण त्याआधी माझ्या नवऱ्याचा मार्गातून काटा काढला पाहिजे तरच आपल्याला सोबत राहता येईल.” तिच्या या अटीमुळेच अंशूने वीरपालची हत्या केली.

पोलिसांनी दोघांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि स्थानिक साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सुनीता आणि अंशु यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवलंय. मृत वीरपालची पाच लहान मुले आता त्यांच्या वृद्ध आजीसोबत रहात आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...