AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्यांच्या वादात पडणे तरुणाला अंगलट आले, तिघांनी मिळून त्यालाच संपवले !

यश गावडे आणि त्याच्या एका मित्राचा वाद झाला होता. तो वाद सोडवण्यासाठी रेहमानने मध्यस्थी केली होती. त्यानंतर काही दिवसानंतर रेहमान आणि यश यांचा वाद झाला होता.

दुसऱ्यांच्या वादात पडणे तरुणाला अंगलट आले, तिघांनी मिळून त्यालाच संपवले !
नोकरीच्या वादातून दिल्लीत तिहेरी हत्याकांड
| Edited By: | Updated on: Nov 01, 2022 | 4:28 PM
Share

इचलकरंजी : जुन्या वादातून एका पानपट्टी चालकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री इचलकरंजी येथील विठ्ठल नगर येथे घडली आहे. रेहमान मलिक नदाफ असे हत्या करण्यात आलेल्या 22 वर्षीय पानपट्टी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसात हत्येची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. यश गावडे, आतिफ चिकोडे आणि साहिल माच्छरे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

मित्राचा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी केली

रेहमान याने दोन महिन्यांपूर्वीच पानपट्टीचा व्यवसाय सुरू केला होता. यश गावडे आणि त्याच्या एका मित्राचा वाद झाला होता. तो वाद सोडवण्यासाठी रेहमानने मध्यस्थी केली होती. त्यानंतर काही दिवसानंतर रेहमान आणि यश यांचा वाद झाला होता.

घराशेजारी बोलावून तिघांनी हल्ला केला

याच कारणातून तिघा संशयितांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास रेहमान याला घराशेजारी बोलावून घेतले. तेथे त्याच्यावर वार केले. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी तेथून पलायन केले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत रेहमानला इचलकरंजी येथील रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

पोलीस केवळ आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी रामेश्वर वैजने, शिवाजीनगर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, शहापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. पोलिसांनी कसून शोध घेत केवळ आठ तासात आरोपींना गजाआड केले. अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

Follow Us
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...