Arnab Goswami| अर्णव गोस्वामींना आजही हायकोर्टाकडून दिलासा नाही; आता सुनावणी उद्या होणार

पत्रकार अर्णव गोस्वामी यांना आजही न्यायालयात दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार असून उद्या जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Arnab Goswami| अर्णव गोस्वामींना आजही हायकोर्टाकडून दिलासा नाही; आता सुनावणी उद्या होणार
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 5:24 PM

मुंबई: पत्रकार अर्णव गोस्वामी यांना आजही उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार असून उद्या जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (No interim relief to Arnab Goswami in Bombay HC)

अर्णव गोस्वामी यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी जामीन मिळावा आणि एफआयआर रद्द करावा म्हणून याचिका दाखल केली होती. त्यावरील युक्तिवाद पूर्ण न झाल्याने ही सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तर, अलिबाग पोलिसांनीही अलिबाग सत्र न्यायालयात याचिका दाखल करून अर्णव यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे. त्यावरही उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या मुंबई उच्च न्यायालय आणि अलिबाग सत्र न्यायालयात काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अर्णव यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याने त्यांना पुन्हा एकदा अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत जावं लागणार आहे. अर्णव गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना थेट जेलमध्ये न नेता क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे या तिघांना नगरपालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे.

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना काल (4 नोव्हेंबर) अटक करण्यात आली. यानंतर अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना जेलमध्ये न नेता 14 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. या नियमानुसार, अर्णव गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींना अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत ठेवलं जाणार आहे. अलिबागमधील ही शाळा आरोपींसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून करण्यात आली आहे. यातच त्यांनी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे. (No interim relief to Arnab Goswami in Bombay HC)

संबंधित बातम्या:

अर्णव गोस्वामींना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा नाहीच, आजची रात्र शाळेत, उद्या पुन्हा सुनावणी

Arnab Goswami | अर्णव गोस्वामी प्रकरण : न्यायालयात नेमकं काय घडलं?

Arnab Goswami| हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्टात काय काय घडलं?

(No interim relief to Arnab Goswami in Bombay HC)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.