AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक पक्का पूल नाही शाळकरी लेकरांसाठी? लटकता पूल कोसळला, 30 पेक्षा जास्त मुलं जखमी

आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्यात सोमवारी एक दुर्घटना घडली. करीमगंज जिल्ह्यातील राताबारी विधानसभा क्षेत्रात नदीवरील लटकता पूल तुटल्यानं 30 शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत.

एक पक्का पूल नाही शाळकरी लेकरांसाठी? लटकता पूल कोसळला, 30 पेक्षा जास्त मुलं जखमी
आसाम पूल दुर्घटना
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 5:59 PM
Share

गुवाहटी: आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्यात सोमवारी एक दुर्घटना घडली. करीमगंज जिल्ह्यातील राताबारी विधानसभा क्षेत्रात नदीवरील लटकता पूल तुटल्यानं 30 शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत. शाळेतून घरी जाताना विद्यार्थी नदीवरील पूल पार करत असताना पूल तुटला आणि विद्यार्थी नदीत कोसळले. करीमगंज जिल्ह्यातील राताबारी येथील चेरागी इथं ही घटना घडली.

नदीवर लटकता पूल तुटला त्यावेळी विद्यार्थी घरी परत जात होते. आसाममधील सिंगला नदीवर बांधण्यात आलेला लटकता पूल चेरागी आणि राताबारीतील इतर भागांना जोडणारा एकमेव पूल होता. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी आणि इतर नागरीक या पुलांचा वापर करत होते.

30 विद्यार्थी जखमी

सोमवारी चेरागी विद्यापीठ हायस्कूलचे विद्यार्थी पुलावरुन सिंगला नदी पार करत होते. यावेळी नेमका पूल तुटला आणि नदीत कोसळला. यामुळे नदी पार करणारे 30 विद्यार्थी नदीत कोसळले आणि जखमी झाले. ही घटना घडली त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी सतर्कता दाखवत विद्यार्थ्यांना वाचवलं. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याात आलं आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांपूर्वी या पुलाची निर्मिती करण्यात आली होती.

मागील आठवड्यात तीन विद्यार्थ्यांचा  मृत्यू

आसामची राजधानी गुवाहटीमध्ये पांडू घाट परिसरात ब्रह्मपुत्रा नदीत बुडाल्यानं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. हे विद्यार्थी ट्युशनवरुन परतत होते. यावेळी त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी नदीत उड्या मारल्या आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघे विद्यार्थी 14 ते 15 वर्ष वयोगटातील होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मपुत्रा नदीतून त्या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. विद्यार्थ्यांनी नदीत उड्या मारण्यापूर्वी त्यांनी घाटावर फोटो सेशन केलं होतं. मोबाईल फोनवरुन त्यांनी काही व्हिडीओ देखील शुट केले होते. नदी किनारी त्यांचं साहित्य आढळून आलं होतं.

इतर बातम्या:

देशात लोकशाही उरली आहे का? संजय राऊतांचा सवाल; राहुल गांधींसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Amravati DCC Bank election : यशोमती ठाकूर यांची हॅट्रिक; मात्र ‘सत्ता अजून स्थापन व्हायचीय’, बच्चू कडू नवा डाव टाकणार?

Assam Karimganj 30 students injured due to Hanging bridge collapses in river

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.