AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सला मंजुरी, पहिल्या ‘पाच’ मध्ये या राज्यांचा समावेश

रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील शिक्षणाच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सला मंजुरी दिली आहे. Ramesh Pokhriyalal

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सला मंजुरी, पहिल्या 'पाच' मध्ये या राज्यांचा समावेश
रमेश पोखरियाल निशंक
| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 1:35 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील शिक्षणाच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सला मंजुरी दिली आहे. सन 2019-2020 चा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स जारी करण्यास केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. पंजाब, चंदीगढ, तामिळनाडू, अंदमान निकोबार आणि केरळला सर्वाधिक ग्रेडिंग इंडेक्स मिळालं आहे. (Central Education Minister Ramesh Pokhriyalal approved release Performance Grading index)

शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेण्याचा प्रयत्न

परफॉरमन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणजेच पीजीआय पहिल्यांदा 2017-18 मध्ये जारी करण्यात आला होता. सरकार या द्वारे देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांपैकी अंदमान आणि निकोबार, पंजाब, चंदीगढ, तामिळनाडू आणि केरळमध्ये 2019-20 मध्ये या राज्यांना लेवल II मध्ये पहिली ग्रेड मिळाली आहे.

एनआयओएसच्या बारावीच्या परीक्षा रद्द

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलींगच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केला आहे. एनआयओएसनं 19 मे रोजी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. सीबीएसई, आयसीएसई पाठोपाठ एनआयओएस बोर्डानं बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बारावीच्या निकालासाठी दररोज ऑनलाईन मिटींग घ्या

सुप्रीम कोर्टात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी अ‌ॅड. ममता शर्मा यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान केंद्र सरकारला दोन आठवड्यामध्ये बारावीचा निकाल कसा लावणार हे सांगा, असा अल्टिमेटम दिला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी देशातील आणि परदेशातील अभ्यासक्रमांचे प्रवेश महच्वाचे आहेत. तुम्ही तातडीनं निर्णय घ्या, गरज पडल्यास दररोज ऑनलाईन मिटिंग घ्या पण दोन आठवड्यामध्ये निर्णय जाहीर करा, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra News LIVE Update | मविआ सरकार काॅमन मिनिमम प्रोग्रामवर चालतं, त्याचं भान ठेवलं तर वाद होणार नाहीत : बाळासाहेब थोरात

दहावीच्या परीक्षा रद्द, आणखी एका बोर्डाचा निर्णय, NIOS च्या बारावीच्या परीक्षा लांबणीवर

(Central Education Minister Ramesh Pokhriyalal approved release Performance Grading index)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.