AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai University: आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी रास्तच, सचिन सावंत यांचं ट्विट

Mumbai University: या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले जावे, असा प्रस्ताव राज्यपालांनी विद्यापीठ प्रशासनासमोर मांडला असतानाच छात्रभारती विद्यार्थी संघटनेने मात्र छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केलीये.

Mumbai University:  आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी रास्तच, सचिन सावंत यांचं ट्विट
Mumbai University Hostel NameImage Credit source: Social Media
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 7:21 PM
Share

मुंबई : मुंबई विद्यापीठात (Mumbai University) मागील काही वर्षापासून अध्ययनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. परदेशी विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाकडे असणारा हा ओढा लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यार्थी वसतिगृह बांधण्यात आले असून त्याचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते शनिवारी झाले. सध्या या वसतिगृहाच्या नामांतराचा वाद सुरू झाला आहे. या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले जावे, असा प्रस्ताव राज्यपालांनी (Governor) विद्यापीठ प्रशासनासमोर मांडला असतानाच छात्रभारती (Chatrabharati) विद्यार्थी संघटनेने मात्र छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केलीये. हे वसतिगृह अधिकृतरीत्या सुरुही झाले नाही तोच त्याच्या नामांतराचा वाद समोर आल्याने विद्यापीठ प्रशासनासमोर मोठा पेच निमार्ण झाला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले जावे

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या नामांतराचा वाद आता सुरू झाला आहे. कलिना संकुलातील विद्यापीठाच्या 4 शैक्षणिक इमारतींचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले जावे, असा प्रस्ताव राज्यपालांनी विद्यापीठ प्रशासनासमोर मांडला. पण दुसरीकडे छत्रपती शाह महाराजांचे शैक्षणिक कार्य हे समस्त विद्यार्थी वर्गास प्रेरणादायी असल्याने वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने कुलगुरुंना पत्राद्वारे केली आहे.

शाहू महाराजांनी विविध वसतिगृह सुरु केले

सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी विविध वसतिगृह सुरु केले. परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती दिली. हे वर्ष छत्रपती शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. शाहू महाराजांचे निधन हे मुंबईत झाले म्हणून मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी छात्रभारतीचे कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी केलीये. शाहू महाराजांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांची समतेची शिकवण विचारात घेता कुणा अन्य व्यक्तीचे नाव या वसतिगृहाला दिले जाऊ नये, अशी मागणी छात्रभारतीचे कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी केली आहे. त्यामुळे हा वाद येत्या काळात तापण्याची चिन्हे आहेत.

सावंत काय म्हणाले?

दरम्यान, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही ट्विट करून वसतिगृहाला शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे नाव देण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. ती मुंबई विद्यापीठाने मान्य केलीच पाहिजे. शाहू महाराजांनी समानतेवर आधारित पुरोगामी विचारसरणीचा पाया रचला. सर्व जाती पंथांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटले, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.