JEE Main Exam 2021 : जेईई मेन परीक्षेसाठी आजपासून नोंदणी सुरु, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

जेईई मेन परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टींग एजन्सीची वेबसाईट jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर अर्ज करु शकतात.

JEE Main Exam 2021 : जेईई मेन परीक्षेसाठी आजपासून नोंदणी सुरु, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
जेईई मेन्सच्या अंतिम सत्राची परीक्षा 26 ऑगस्टपासून सुरू होणार
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 10:46 AM

JEE Main Exam 2021 नवी दिल्ली: जेईई मेन परीक्षा 2021 च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी सुरु झाली आहे. जेईई मेन परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टींग एजन्सीची वेबसाईट jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर अर्ज करु शकतात. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करु इच्छितात ते 12 जुलैपूर्वी अर्ज दाखल करु शकतात. (JEE Main Exam 2021 registration for session 4 begins today at jee main nta nic in )

परीक्षा कधीपासून

जेईई मेन परीक्षा 2021 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागणार आहे. चौथ्या सत्राची परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सीनं याबाबात नोटिफिकेशन जारी केलं आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत. एप्रिल आणि मे सत्रातील अर्ज केलेले सत्र, प्रवर्ग आणि विषय इत्यादी माहिती अद्यावत करावी लागणार आहे.

जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा?

जेईई मेन परीक्षा 2021 सेशन 4 साठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील स्टेपचा वापर करणं आवश्यक आहे.

स्टेप 1 नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या जेईई मेन परीक्षा वेबसाईटला भेट द्या

स्टेप 2 जेईई मेन परीक्षा 2021 या दिलेल्या लिंकवर क्लिक करा

स्टेप 3 नवीन होम पेज ओपन होईल त्यावर विद्यार्थी ईमेल आणि मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करु शकतात

स्टेप 4 लॉगीन डिटेल्स मिळाल्यानंतर विद्यार्थी अर्जातील सर्व माहिती भरुन परीक्षा शुल्क जमा करु शकतात

स्टेप 5 अर्ज भरल्यानंतर डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट काढून सोबत ठेवा

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली जात आहे.

कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकाप्रमाणं जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा 27 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत घेण्यात येणार होती. त्यानंतर जेईई मेन परीक्षा मे सत्राची परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आली होती. देशातील कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांनी जेईईच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती.

इतर बातम्या

JEE Main 2021 April परीक्षा लांबणीवर टाका, विद्यार्थ्यांची POSTPONEJEEMains2021 हॅश्टॅगसह ट्विटरवर मोहीम

UGC NET 2021 Postpone : सीबीएसई, नीट पाठोपाठ नेटची परीक्षा लांबणीवर टाका, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मागणी

(JEE Main Exam 2021 registration for session 4 begins today at jee main nta nic in )

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.