AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊमध्ये तुम्ही काय केल? कणेरीवाडीच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेचं रुपडं पालटलं

गाव करेल ते राव काय करेल ही म्हण कोल्हापूरमधील कणेरीवाडी ग्रामस्थांनी खरी करुन दाखवली आहे. (Kaneriwadi ZP School)

लॉकडाऊमध्ये तुम्ही काय केल? कणेरीवाडीच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेचं रुपडं पालटलं
कणेरीवाडीची डिजीटल शाळा
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Jan 16, 2021 | 5:32 PM
Share

कोल्हापूर: संपूर्ण गावाने एखादी गोष्ट ठरवली तरी कोणत्याही अडचणींवर मात करत असाध्य गोष्ट साध्य करता येते. कोल्हापूर जिल्ह्यातील हे करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील या ग्रामस्थांनी सिद्ध करून दाखवलं आहे. कणेरीवाडी ग्रामस्थांच्या पुढाकाराने गावातील प्राथमिक शाळेचं नुसतं रुपच बदल नाही तर ही शाळा डिजीटल झालीय. पहिली ते सातवी पर्यंत 24 वर्ग डिजीटल असणारी ही राज्यातील पहिली जिल्हा परिषदेची शाळा ठरलीय. कणेरीवाडीची शाळा राज्यातील सर्वाधिक पटसंख्या असणारी शाळा आहे. (Kaneriwadi Villagers converted ZP School into Digital School)

लॉकडाऊनमध्ये पालटलं शाळेचे रुप

कणेरीवाडीच्या जिल्हा प्राथमिक शाळेत प्रवेश केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या अभ्यासपूर्ण माहितीने भिंतीवर रेखाटलेली ही चित्र पाहायला मिळतात. या शाळेतील सुसज्य वर्गखोल्या,अत्याधुनिक पद्धतीने तयार झालेला संगणक कक्ष आणि प्रयोगशाळा पाहून आपल्याला क्षणभर ही एखाद्या खाजगी शिक्षण संस्थेची शाळा आहे असं वाटेल. पण तसं नाहीये, ही शाळा कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत चालवली जाते. आता तुम्हाला वाटेल की ही जिल्हा परिषद शाळा असूनही इतक्या सुसज्ज अवस्थेत कशी? या शाळेला भला मोठा निधी मिळाला असेल असा अंदाज जर तुम्ही बांधत असाल तर तुम्ही पुन्हा एकदा चुकताय. कारण कणेरीवाडी ग्रामस्थांच्या सहभागातून लॉकडाऊनच्या काळात शाळेच हे रूप पालटलं आहे.

Kaneriwadi ZP School

कणेरीवाडी जिल्हा परिषद शाळा

राज्यात सर्वाधिक पटसंख्या असलेली प्राथमिक शाळा अशी या कणेरीवाडी शाळेची ओळख आहे. याचं शाळेन आता डिजीटल रूप धारण केलंय. पहिली ते सातवी पर्यंतच्या 24 खोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय हे सगळं आता नव्या रुपात विद्यार्थ्यांसमोर आलंय, असं कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी सांगितले. कणेरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत 713 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध क्षेत्रात शाळेचे विद्यार्थी चमकत आहेत.

शाळेचे रुपडं बदलण्याची कहानी देखील रंजक

प्राथमिक शाळेची दुरवस्था पाहता याविषयी चर्चा करण्यासाठी लॉकडाऊन काळात गावचे प्रतिनिधी, शिक्षक आणि पालकांची बैठक झाली. त्या बैठकीत शाळेला डिजिटल रूप देण्याचा मुद्दा समोर आला. लोकवर्गणी काढताना कोणी पाचशे आणि हजार तर कोणी पाच लाखांपर्यंतची देणगी दिली. पाहता पाहता जवळपास 30 लाख रुपये खर्च करून ही संपूर्ण शाळा डिजीटल बनलीय, असं शिक्षक विष्णू काटकर यांनी सांगितले.

Kaneriwadi ZP School

बोलक्या भिंती

कोरोनामुळे शाळा गेल्या दहा महिन्यांपासून बंद आहेत. आता शाळा पुन्हा सुरु होत असताना शाळेत आलेले विद्यार्थी शाळेचं पालटलेलं रुप पाहून भारावून जात आहेत. शाळेमध्ये ग्रामस्थांच्या एकजूटीतून झालेल्या बदलामुळे आनंद वाटतोय, असं सातवीमध्ये शिकणाऱ्या संध्या गुरव या विद्यार्थिनीनं सांगितले.

संबंधित बातम्या:

काचेच्या भिंती, झिरो एनर्जी खोल्या, झेडपीच्या ‘या’ शाळेत प्रवेशासाठी 4 हजार विद्यार्थी वेटिंगवर

अस्सं भारी नियोजन करा आणि शाळा सुरु करा, इंदापुरातल्या 2 शाळांचा ‘अफ्टर कोव्हिड स्कूल ओपनिंग पॅटर्न’!

(Kaneriwadi Villagers converted ZP School into Digital School)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली