AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC 10th Result 2022 : उद्या दहावीचा रिझल्ट, निकाल कुठे पाहाल?; संपूर्ण माहिती एका क्लिकवर

SSC Result 2022 Maharashtra Board : या परीक्षेत विद्यार्थ्यांना ज्यादा वेळ देण्यात आला होता. 70 ते 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 30 मिनिटे अधिकचा वेळ देण्यात आला होता. तर 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अधिक देण्यात आली होती.

SSC 10th Result 2022 : उद्या दहावीचा रिझल्ट, निकाल कुठे पाहाल?; संपूर्ण माहिती एका क्लिकवर
CBSE Compartment 2 ResultsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 17, 2022 | 11:35 AM
Share

मुंबई: इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर इयत्ता दहावीच्या  (SSC Results)  निकालाची प्रतिक्षाही अखेर संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घर बसल्या आपल्या मोबाईलवर, संगणकावर किंवा लॅपटॉपवर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये (Maharashtra Board 10th Results) ही परीक्षा घेण्यात आली होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ही माहिती दिली आहे. गायकवाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर संपली आहे.

कुठे पाहाल निकाल

tv9marathi.com

https://www.mahahsscboard.in/

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.mahresult.nic.in

21 हजार परीक्षा केंद्रातून होती परीक्षा

कोरोना संकटानंतर प्रथमच दहावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. त्यासाठी 21 हजार 384 परीक्षा केंद्रे होती. यात 5 हजार 50 परीक्षा केंद्रे मुख्य होती. तर 16 हजार 344 ही उपकेंद्रे होती.

16 लाख विद्यार्थी

इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 38 हजार 172 मुलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

विद्यार्थ्यांना ज्यादा वेळ दिला

दरम्यान, या परीक्षेत विद्यार्थ्यांना ज्यादा वेळ देण्यात आला होता. 70 ते 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 30 मिनिटे अधिकचा वेळ देण्यात आला होता. तर 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अधिक देण्यात आली होती. परीक्षा केंद्रात गैरप्रकार होऊ नये म्हणून चित्रीकरण करण्यात आले होते. या शिवाय भरारी पथके आमि महिलांची विशेष पथकेही तैनात करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा ताणतणाव घालवण्यासाठी समूपदेशकही तैनात ठेवण्यात आले होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.