AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gujarat Assembly Election 2022 Result: राहुल गांधी गुजरातमध्ये का गेले नाही? यशोमती ठाकूर यांनी दिलं उत्तर

Gujarat Assembly Election 2022 Result: 'पण इतिहास भारत जोडोचं...' यशोमती ठाकूर म्हणाल्या....

Gujarat Assembly Election 2022 Result: राहुल गांधी गुजरातमध्ये का गेले नाही? यशोमती ठाकूर यांनी दिलं उत्तर
yashomati thakurImage Credit source: instagram
| Updated on: Dec 08, 2022 | 12:19 PM
Share

नागपूर: गुजरात विधानसभा निवडणूक 2022 ची मतमोजणी सुरु आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट दिसतय. 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपाला हरवणं काँग्रेसला जमलेलं नाही. इतक्या वर्षाच्या सत्तेनंतर प्रस्थापित सरकारविरोधात लाट असली पाहिजे. पण इथे उलट चित्र दिसतय. भाजपा मागच्या काही निवडणुकांपेक्षा विक्रमी मताधिक्क्याने विजयी होईल असं दिसतय.

काँग्रेसवर चहूबाजूंनी टीका

सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार भाजपा 151 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 21 आणि आम आदमी पार्टी 6 जागांवर आघाडीवर आहे. गुजरातचे हे निकाल येत असताना, काँग्रेस पक्षावर टीका सुरु आहे. त्यांना गुजरातमध्ये 27 वर्षानंतरही भाजपाला सत्तेबाहेर करणं शक्य झालेलं नाही.

भारत जोडो यात्रेवर प्रश्नचिन्ह

गुजरातमधील या दारुण पराभवानंतर काँग्रेसवर चहूबाजूंनी टीका सुरु झाली आहे. गुजरात आणि हिमाचल विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु असताना, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु होती. आता सर्वसामान्य आणि विरोधकांकडून यावर प्रश्न विचारला जातोय.

गुजरातमध्ये निवडणूक असताना राहुल गांधी यांनी तिथे जाऊन का प्रचार केला नाही? ते दक्षिणेकडच्या राज्यात का फिरत होते? असे प्रश्न विचारले जातायत. त्यावर काँग्रेस नेत्या, आमदार यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं आहे.

यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं

“गुजरात मध्ये धनशक्ती, सत्तेचा अमर्याद वापर झाला आहे. अशा प्रवृत्तीचा विरोध करायचा असेल तर लोकांमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, काँग्रेस ते काम करतंय. निवडणूक निकालांवर पक्ष आत्मचिंतन करेलच, पण इतिहास भारत जोडोचं योग्य मुल्यांकन करेल. भारत जोडो यात्रा काँग्रेसची विचारधारा मजबूत करत आहे. या यात्रेचा उद्देश्य देश वाचवणं आहे, कुण्या राज्याची सत्ता मिळवणं नाही. हुकूमशाही प्रवृत्तीचा पाडाव करायचा असेल तर विचारांचा किल्ला अधिक मजबूत करावा लागेल” असं त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं