AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gujarat Assembly Election 2022 Result: राहुल गांधी गुजरातमध्ये का गेले नाही? यशोमती ठाकूर यांनी दिलं उत्तर

Gujarat Assembly Election 2022 Result: 'पण इतिहास भारत जोडोचं...' यशोमती ठाकूर म्हणाल्या....

Gujarat Assembly Election 2022 Result: राहुल गांधी गुजरातमध्ये का गेले नाही? यशोमती ठाकूर यांनी दिलं उत्तर
yashomati thakurImage Credit source: instagram
| Updated on: Dec 08, 2022 | 12:19 PM
Share

नागपूर: गुजरात विधानसभा निवडणूक 2022 ची मतमोजणी सुरु आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट दिसतय. 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपाला हरवणं काँग्रेसला जमलेलं नाही. इतक्या वर्षाच्या सत्तेनंतर प्रस्थापित सरकारविरोधात लाट असली पाहिजे. पण इथे उलट चित्र दिसतय. भाजपा मागच्या काही निवडणुकांपेक्षा विक्रमी मताधिक्क्याने विजयी होईल असं दिसतय.

काँग्रेसवर चहूबाजूंनी टीका

सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार भाजपा 151 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 21 आणि आम आदमी पार्टी 6 जागांवर आघाडीवर आहे. गुजरातचे हे निकाल येत असताना, काँग्रेस पक्षावर टीका सुरु आहे. त्यांना गुजरातमध्ये 27 वर्षानंतरही भाजपाला सत्तेबाहेर करणं शक्य झालेलं नाही.

भारत जोडो यात्रेवर प्रश्नचिन्ह

गुजरातमधील या दारुण पराभवानंतर काँग्रेसवर चहूबाजूंनी टीका सुरु झाली आहे. गुजरात आणि हिमाचल विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु असताना, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु होती. आता सर्वसामान्य आणि विरोधकांकडून यावर प्रश्न विचारला जातोय.

गुजरातमध्ये निवडणूक असताना राहुल गांधी यांनी तिथे जाऊन का प्रचार केला नाही? ते दक्षिणेकडच्या राज्यात का फिरत होते? असे प्रश्न विचारले जातायत. त्यावर काँग्रेस नेत्या, आमदार यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं आहे.

यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं

“गुजरात मध्ये धनशक्ती, सत्तेचा अमर्याद वापर झाला आहे. अशा प्रवृत्तीचा विरोध करायचा असेल तर लोकांमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, काँग्रेस ते काम करतंय. निवडणूक निकालांवर पक्ष आत्मचिंतन करेलच, पण इतिहास भारत जोडोचं योग्य मुल्यांकन करेल. भारत जोडो यात्रा काँग्रेसची विचारधारा मजबूत करत आहे. या यात्रेचा उद्देश्य देश वाचवणं आहे, कुण्या राज्याची सत्ता मिळवणं नाही. हुकूमशाही प्रवृत्तीचा पाडाव करायचा असेल तर विचारांचा किल्ला अधिक मजबूत करावा लागेल” असं त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

नागपुरात अवकाळी पावसाचा हाहाकार! कळमना मार्केटमध्ये धान्य भिजले
नागपुरात अवकाळी पावसाचा हाहाकार! कळमना मार्केटमध्ये धान्य भिजले.
धाराशिव आणि परळीत अवकाळी पावसाचा कहर! ज्वारी पिकाचे नुकसान
धाराशिव आणि परळीत अवकाळी पावसाचा कहर! ज्वारी पिकाचे नुकसान.
प्रेम विवाहासाठी आता आई-वडिलांची परवानगी आवश्यक!
प्रेम विवाहासाठी आता आई-वडिलांची परवानगी आवश्यक!.
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....