AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहशतवाद्यांकडून काका आणि वडिलांची हत्या, मुस्लीम बहुल भागात मुलीने निवडणुकीत मारली बाजी

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने विजय मिळवला नसला तरी चांगली कामगिरी केली आहे. जम्मूमध्ये भाजपला चांगलं यश मिळालंय. भाजपच्या एका उमेदवाराने देखील विजय मिळवला आहे. जिच्या वडिलांची आणि काकाची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली होती. तिने निवडणूक लढवत बाजी मारली आहे.

दहशतवाद्यांकडून काका आणि वडिलांची हत्या, मुस्लीम बहुल भागात मुलीने निवडणुकीत मारली बाजी
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 08, 2024 | 6:52 PM
Share

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवता आली नसली तरी जम्मूमध्ये भाजपला चांगलं यश मिळाले आहे. काश्मीर खोऱ्यात भाजपला यश मिळणार नाही हे अपेक्षित होतं. कलम 370 हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणुक होती. ज्यामध्ये भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण जनतेच्या मनात याबाबत कोणताही रोष नसल्याचं समोर आलं आहे. जम्मूमध्ये भाजपने एका तरुण उमेदवाराला संधी दिली होती. जिचे वडील आणि काका यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

किश्तवाड मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवार शगुन परिहार हिने विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, परिहार यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या सज्जाद अहमद किचलू यांचा 521 मतांनी पराभव केला आहे. शगुन परिहार यांना उमेदवार करुन त्यांना सांत्वन मिळेल अशी भाजपला आशा होती. त्यात भाजपला यश मिळालं. किश्तवाडा विधानसभा मतदारसंघात मुस्लीम लोकसंख्या मोठी आहे, त्यामुळे भाजपने दोन्ही समाजाच्या लोकांचा पाठिंबा मिळेल अशा चेहऱ्याला संधी दिली.

शगुन परिहार यांना उमेदवारी दिल्याने दोन धार्मिक गटांमधील दरी कमी होईल, अशी भाजपची अपेक्षा होती. तिला भावनिक आधारही मिळेल. शगुन परिहार यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर शगुन परिहार यांनी सांगितले की, ती परिसरात समृद्धी आणि शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करणार आहे.

शगुन परिहार यांचे कुटुंब सुरुवातीपासून भाजपशी संबंधित होते. त्यांचे काका अनिल परिहार हे जम्मू-काश्मीरमधील भाजपचे प्रमुख नेते होते. ते जम्मू-काश्मीर भाजपचे सचिव होते. नोव्हेंबर 2018 मध्ये शगुन परिहारचे वडील अजित परिहार आणि काका अनिल परिहार यांची किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. आपल्या निवडणूक प्रचारात शगुनने लोकांना आश्वासन दिले की ती शांतता, सुरक्षा आणि समृद्धी आणण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.

शगुन परिहार यांनी एम.टेक केले असून त्या जम्मू-काश्मीर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीही तयारी करत आहे. शगुनचे वडील अजित परिहार आणि तिचे काका अनिल परिहार हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. राज्यातील पंचायत निवडणुकीपूर्वी 1 नोव्हेंबर 2018 रोजी दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. शगुनचे काका अनिल यांचाही मुस्लीम समाजात चांगलाच प्रभाव होता. त्याचा परिणाम या निवडणुकीतही दिसून आला.

Follow Us
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब