AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karnataka Election Results 2023 : निकाल कर्नाटकाचा, पडसाद महाराष्ट्रात, शरद पवार यांच्याकडून महत्वाचे संकेत

Karnataka Election Results 2023 : कर्नाटक निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना शरद पवारांनी एक महत्वाच पाऊल उचललं. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकरणही अजून रंगतदार होणार आहे.

Karnataka Election Results 2023 : निकाल कर्नाटकाचा, पडसाद महाराष्ट्रात, शरद पवार यांच्याकडून महत्वाचे संकेत
sharad pawar Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 13, 2023 | 2:29 PM
Share

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने यश मिळवलय. कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. भाजपाचा कर्नाटकमध्ये पराभव झालाय. कर्नाटकात भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना होईल, असा एक्झिट पोलचा अंदाज होता. पण प्रत्यक्ष मतदारांनी कौल मात्र वेगळा दिलाय. सत्ताधारी भाजपाचा या राज्यात दारुण पराभव झालाय. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामुळे भाजपा विरोधात असलेल्या पक्षांनाही बळ मिळालय.

खासकरुन महाराष्ट्रात काँग्रेसच्या कर्नाटकातील विजयाचे पडसाद उमटलेला पहायला मिळू शकतात. महाविकास आघाडी अधिक बळकट होईल, अशी शक्यता आहे.

शरद पवारांकडून महत्वाचे संकेत

मागच्या काही दिवसात महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याच चित्र निर्माण झालं होतं. महाविकास आघाडी फुटेल अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. पण कर्नाटकच्या निकालानंतर महाविकास आघाडी अधिक भक्कम होऊ शकते. यांचे संकेत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.

पवारांनी कोणाशी चर्चा केली?

दुपारपर्यंत कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. त्याशिवाय पवारांनी काँग्रेस नेत्यांसोबत सुद्धा फोनवरुन संवाद साधला. लवकरच महाविकास आघाडीची मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. मतभेद वाढत होते

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट आहे. अलीकडे या तिन्ही पक्षात मतभेद वाढत असल्याच चित्र निर्माण झालं होतं. पण कर्नाटक निवडणूक निकालानंतर चित्र बदलू शकतं. सध्या राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्याआधी महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर होती. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्यामुळे मागच्यावर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.