
लोकसभेचे निकाल आल्यानंतर भाजपाला केंद्रात स्वत:च्या बळावर सरकार स्थापन करण्याएवढे बहुमत मिळालेले नाही. तर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीला कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता केंद्रात भाजपा सरकारला मित्रपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. येथे महाराष्ट्रातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला मिळालेल्या कमी जागांमुळे जबाबदारी स्वीकारत केंद्राला आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. विरोधकांनी भाजपा घटना बदलणार असा चुकीचा प्रचार केल्याने हे जागांचे नुकसान झाले अन्यथा भाजपा केंद्रात स्वबळावर पुन्हा आले असते असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 जून रोजी पुन्हा तिसऱ्यांदा सरकार स्थापन स्थापन करणार आहे.
भाजपने देशातील सगळे २४१ खासदार दिल्लीत बोलावले आहेत. इंडिया आघाडीच्या हालचालीनंतर भाजपने खबरदारी घेतली आहे. उद्या सगळ्या २४१ खासदारांना दिल्लीत बोलवल आहे. ७ तारखेला एनडीए आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.
नवी मुंबई : कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. सागर कुमार टकले आणि प्रज्ञेश नरेंद्र कोठेकर अशी या दोघांची नावे आहेत. जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान वेळेत ‘से-Say’ दाखल करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याकरीता सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टकले यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. आणि तडजोडी अंती ४० हजार रुपये लाच स्वीकारली.
इंडिया आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षातर्फे उरण शहरातील गणपती चौक येथे असलेल्या काँग्रेस कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर पेढे वाटून, एकमेकांना शुभेच्छा देऊन, काँग्रेस पक्षाचा विजय असो असे नारे देत काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. यावेळी कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सर्वांना शुभेच्छा देत पदाधिकारी कार्यकर्त्यांना पेढे भरवून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असलेली एनडीएच्या घटक पक्षांची बैठक आता संपली आहे. बैठक संपल्यानंतर आता एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठिंब्याची पत्रे सादर केल्याचे कळते.
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाची पिछेहाट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. यासह त्याने राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या निवासस्थानी जमली आहे. राजीनामा त्यांनी मागे घ्यावा अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली आहे.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा आणि खासदार राहुल गांधी भारत आघाडीच्या बैठकीसाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले.
#WATCH दिल्ली: कांग्रेस संसदीय दल की अध्यक्ष सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा और सांसद राहुल गांधी INDIA गठबंधन की बैठक के लिए पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे के आवास पहुंचे। pic.twitter.com/A8hkKCr6w0
— ANI_HindiNews (@AHindinews) June 5, 2024
काँग्रेस पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा करावा, असा दबाव मित्रपक्षांनी टाकल्याची सूत्रांची माहिती आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशिवाय सत्ता स्थापन करणं कठीण आहे. मात्र असं असलं तरी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी रणनिती आखल्याचं बोललं जात आहे.
नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांनी काँग्रेससोबतही काम केलं आहे. त्यामुळे ते सर्वांचे आहेत. नरेंद्र मोदींचं काम हम करे सो कायदा आहे. त्यामुळे त्याला इतर पक्षांना घेऊन सरकार चालवणं कठीण आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार प्रवीण पोटे यांचा अमरावती शहर भाजप अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन पोटे यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रवीण पोटे यांनी राजीनामा पाठवला आहे. प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिल्याने अमरावती भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
विशाल पाटील उद्या किवा परवा दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहेत.सांगली लोकसभा विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून लढवली होती. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून पाठिंबा देणार आहेत. विश्वजीत कदम यांच्यासोबत विशाल पाटील दिल्लीत येणार आहेत.
लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे विजयानंतर आज एकनाथ खडसेंचा घरी जाऊन आशीर्वाद घेतला.
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे दोन सोन्याचे हार अर्पण करण्यात आले. हवेली तालुक्यातिल कुंजीरवाडी येथील विठ्ठल भक्त बबन रामचंद्र तुपे यांनी दोन सोन्याचे हार अर्पण केले आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्हाला पुन्हा चांगलं यश मिळेल. त्यांना सरकारमध्ये राहूनच संघटनेचं काम करावं अशी आमची इच्छा आहे – बावणकुळे
निकाल कमी आल्याने आम्हाला त्याचं दु:ख आहे. पण आम्ही पुन्हा एकदा संघटनेचं आणखी चांगलं काम करु. – बावणकुळे
फडणवीसांनी त्यांनी भावना व्यक्त केली आहे. पण सरकारमध्ये राहून देखील काम करता येईल अशी आमची भूमिका आहे. असं चंद्रशेखर बावणकुळे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी व्यक्त केली इच्छा.
देवेंद्र फडणवीस यांनी आपण राज्यात महायुतीला मिळालेल्या कमी जागांमुळे आपल्याला उपमुख्यमंत्री पदावरुन मोकळं करावे असे म्हटले आहे. मला सरकारमधून मोकळं करावं, केंद्रीय नेतृत्वाला विनंती करणार असेही फडणवीस म्हणाले आहेत.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजाराचे सोन्याचे दोन हार अर्पण केले आहेत, हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील विट्ठल भक्त बबन रामचंद्र तुपे यांनी श्री विठ्ठलास चार पदरी आणि श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे हार केले अर्पण केले आहेत.
आता मी खासदार झालो आहे, जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख झालो आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणी माझ्यावर टीका केली ते विसरून जनतेच्या प्रश्नासाठी काम करणार असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.
एनडीएचं सरकार स्थापन व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. नितेश कुमार, चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेऊन आपण सरकार बनवू असं काहींना वाटू लागलंय. सरकारला कोणताच धोका नाही, सव्विस पक्षांपेक्षा या चार पक्षाचं सरकार केव्हाही चांगलं, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
ईशान्य मुंबईतून संजय पाटील यांचा विजय झाल्यानंतर संजय पाटील हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने हा निकाल आला. राज्यात शेतकऱ्यांच्या धोरणामुळे ही अनुभूती आली. भाजपने उमेदवार घोषित केले तेव्हाच पक्षाने उमेदवार देणे गरजेचे होते, असे हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.
बारामती शरद पवार यांचीच पुन्हा सिद्ध झालं आहे. कौटुंबिक पातळीवर आम्ही एक आहोत.. श्रीनिवास पवार यांनी घेतली होती अजित पवार यांच्या विरोधात भूमिका.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया… विधानसभेला कार्यकर्ते पुन्हा उत्साहाने काम करतील… माझ्या आयुष्यातील वेगळी आणि विचित्र निवडणूक होती… मी कोणाची अवहेलना केली नाही, प्रक्षोभक बोलले नाही… असं वक्तव्य पंकडा मुंडे यांनी केलं आहे.
काँग्रेसच्या विजयी उमेदवार शोभा बच्छाव धुळ्यातील काँग्रेस भवन मध्ये दाखल… काँग्रेस भवनमध्ये स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत छोटी बैठक… काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट इतर पक्ष उपस्थित
अजित पवार गट बारामतीच्या पराभवाची करणार चिंतन… दोन दिवसात बैठक होण्याची शक्यता… दोन दिवसात अजित पवारांना रिपोर्ट दिला जाणार… काही बूथवर शरद पवार गटाचा पोलिंग एजंट नसताना कसं मतदान जास्त झालं याच चिंतन केलं जाणार
NDA नेते आजच पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ राष्ट्रपतींना पाठिंब्याचे पत्र देऊ शकतात…. आज संध्याकाळी चार वाजता होणार NDA ची बैठक… बैठकीनंतर आजच राष्ट्रपतींना पत्र देण्याची शक्यता
पवार गटाचे सर्व खासदार 9 जूनला मुंबईत एकत्र येणार आहेत. 9 जूनला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत 10 जूनला पक्षाच्या वर्धापन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत भाजपचा दारूण पराभव झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केलं जाणार.
केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता आहे. आज भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होणार.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका. नरेंद्र मोदी हे भगवान ते पराभूत झाले आहेत. मोदी हा आतापर्यंत चेहरा होता त्यांची गॅरंटी संपली आहे. तुम्ही पराभव स्वीकारा बीजेपीला बहुमत मिळालं नाही, असं राऊत म्हणाले.
पुण्यात भाजपचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा भव्य सत्कार. पुण्यातील कसब्यात करण्यात येणार मोहोळ यांचं जंगी स्वागत. ग्रामदैवत कसबा गणपतीला आरती करत करण्यात येणार जल्लोष. पुण्यातील गणेश मंडळ आणि ढोल ताशा पथक एकत्रित येत विजयोत्सव साजरा करणार.
नाशिक – दिंडोरीचे नवनियुक्त खासदार भास्कर भगरे शिरसगाव मध्ये दाखल. काल याच गावात झाला होता लढाऊ विमानाचा अपघात. भास्कर भगरे यांच्याकडून घटना स्थळाची पाहणी करण्यात आली.
गेल्या वर्षी पेक्षा यंदा वंचितकडून लढलेल्या वसंत मोरे यांना कमी मतदान झाले आहे. काल झालेल्या निकलात वसंत मोरे यांना फक्त ३१ हजार मते मते मिळाली.
शिवसेनेचे विजयी खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबई आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सर्व विजयी खासदारांना उतात्काळ मुंबईत बोलवले आहे.
निवडणूक प्रचारात निर्माण झालेल्या गरम वातावरण आणि उन्हाचा पारा वाढल्यानंतर मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर मुंबईतील सर्वच भागात पाऊस पडत आहे.
शेवटच्या फेरीचा निकाल जाहीर. अटीतटीची लढत या निवडणुकीमध्ये बघायला मिळाली. शिंदे गटाला नक्कीच मोठा झटका बसलाय.
कल्याण काळे यांना 20 व्या फेरीत 65,837 मतांची आघाडी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव जवळपास निश्चित.
धैर्यशील मोहिते पाटील यांना 484521 मते तर भाजपच्या नाईक निंबाळकर यांना 399938 मते
ओमराजे यांना 7 लाख 19 हजार 553 मते तर अर्चना पाटील यांना 4 लाख 4 हजार 615 मते मिळाली आहेत.
विसावी फेरी- वसंतराव चव्हाण 411296, प्रताप पाटील चिखलीकर 388892, काँग्रेसचे वसंतराव चव्हाण -22404. एकविसावी फेरी- वसंतराव चव्हाण – 429316, प्रताप पाटील चिखलीकर – 407787. काँग्रेसचे वसंतराव चव्हाण 21529 मतांनी आघाडीवर
सोलापूरमध्ये अटीतटीचा सामना बघायला मिळाला. आता सोलापूरमधून प्रणिती शिंदे विजयी झाल्या आहेत. सुरूवातीपासूनच प्रणिती शिंदे आघाडीवर होती.
साताऱ्यातून उदयनराजे भोसले हे विजयी झाले आहेत. या लढतीकडे राज्याचे लक्ष होते. भाजपाकडून उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवली.
नुकताच शिरूर लोकसभेचा निकाल जाहीर झालाय. अमोल कोल्हे हे विजयी झाले आहेत. सुरूवातीच्या फेरीपासूनच अमोल कोल्हे हे आघाडीवर होते.
ओमराजे निंबाळकर यांना 2 लाख 95 हजार 288 मतांची विक्रमी लीड. ओमराजे यांना 6 लाख 74 हजार 812 मते तर अर्चना पाटील यांना 3 लाख 79 हजार 524 मते.
उज्वल निकम यांचा पराभव झालाय. वर्षा गायकवाड या विजयी झाल्या आहेत. हा मोठा धक्का बीजेपीला म्हणावा लागणार आहे.
पालघर लोकसभेची मतमोजणी पूर्ण झालीये. पालघर लोकसभा मतमोजणीची 29 वी फेरी पूर्ण. डॉ. हेमंत सावरा मताधिक्याने विजयी.
पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत. 33623 मतांनी पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत. बजरंग सोनवणे हे पिछाडीवर आहेत.
कल्याणमधून श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत. विजयानंतर श्रीकांत शिंदे हे भावूक होताना दिसत आहेत. सुरूवातीपासूनच श्रीकांत शिंदे आघाडीवर होते.
काँग्रेस उमेदवार एक लाख ५९ हजार ४२ मतांनी विजयी झाले. विजयानंतर काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येत आहे.
जालन्यात रावसाहेब दानवे 43 हजार 312 मतांनी पिछाडीवर आहेत. 15 व्या फेरीत दानवे पिछाडीवर आहेत. या मोठा धक्का म्हणावा लागेल.
बीडमध्ये मोठी टक्कर बघायला मिळतंय. आता पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत. 16 हजार मतांनी पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. बजरंग सोनवणे हे पिछाडीवर आहेत.
संदिपान भुमरे हे 51546 मतांनी आघाडीवर आहेत. संभाजीनगरमधून संदिपान भुमरे (शिवसेना) 291720, इम्तियाज जलील (MIM) 240174, चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) 184439
20 व्या फेरीमध्ये संजय देशमुख 4 लाख 37 हजार 281, राजश्री पाटील 3 लाख 73 हजार 949, संजय देशमुख -63 हजार 332 लीडवर
शिरूर लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा असून अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत. 16 व्या फेरीत शिरुरमधुन अमोल कोल्हे 71982 मतांनी आघाडीवर.
बीडमध्ये कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. निकाल लागण्याआधीच बीडमध्ये जल्लोष. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळला
सोळावी फेरी अखेर 2 लाख 05 हजार 392 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी.
मावळमधून महाविकास आघाडीचे श्रीरंग बारणे हे विजयी झाले आहेत. संजोग वाघेरे यांचा पराभव झालाय.
लातूरमधून शिवाजी काळगे हे विजयी आहेत. शिवाजी काळगे हे सुरूवातीपासून आघाडीवर बघायला मिळाले.
कल्याण लोकसभा मतमोजणीची 15 वी फेरी सुरू आहे. श्रीकांत शिंदे 199700 मतांनी आघाडीवर आहेत. आता थोड्याच वेळात कल्याणमधील चित्र स्पष्ट होईल.
शिर्डीतून बाळासाहेब वाकचाैर विजयी झाले आहेत. बाळासाहेब वाकचाैर हे ठाकरे गटाचे आहेत. अंतिम फेरी नुकताच पार पडलीये.
बीडच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. मोठी टक्कर बीडमध्ये बघायला मिळत आहे. पंकजी मुंडे या आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. 11 हजार मतांनी पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत.
श्रीरंग बारणे (महायुती) – 446602, संजोग वाघेरे (महाविकास आघाडी)- 376030, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 70,572 मतांनी आघाडीवर.
काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव या देखील मतमोजणी केंद्रावर झाल्या दाखल आहेत. विजयाची मते जास्त नसल्याने फेर मतमोजणी मागणी करण्याची शक्यता.
मध्यप्रदेशमध्ये अजून काम करण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. लोकसभेच्या निकालावर बोलताना शरद पवार हे दिसले.
हा निकाल परिवर्तनाला पोषक आहे, असे मोठे विधान शरद पवार यांनी केले आहे. परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेऊ असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. यावेळी लोकसभेच्या निकालावर शरद पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. आपल्या एकट्याचे यश नसून संपूर्ण महाविकास आघाडीचे यश असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
राजाभाऊ वाजे यांचा नाशिकमधून विजय जवळपास निश्चित आहे. यामुळे आता शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.
तेराव्या फेरीत प्रणिती शिंदे 33207 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 352075 मते तर भाजपच्या राम सातपुते यांना 318868 मते मिळाली आहेत.
जालन्यातून रावसाहेब दानवे हे पिछाडीवर आहेत. काही फेऱ्यांमध्ये दानवे हे पुढे होते. आता जालन्याच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सुनील तटकरे हे मोठ्या आघाडीवर दिसत आहे. तब्बल 80 हजारांनी सुनील तटकरे हे आघाडीवर आहेत. 27 वी फेरी सध्या सुरू आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडे तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये जोरदार टक्कर बघायला मिळत आहे.
अभय पाटील, काँग्रेस. – 294278, अनूप धोत्रे, भाजप.- 310449, प्रकाश आंबेडकर, वंचित. – 189294, 16371 मतांनी भाजप आघाडीवर
सोळाव्या फेरी अखेर उदयनराजे भोसले 12,781 मतांनी आघाडीवर आहेत. उदयनराजे – 5,17,211, शशिकांत शिंदे -5,04,430 मते.
श्रीकांत शिंदे 166413 मतांनी आघाडीवर आहेत. सुरूवातीच्या फेरीपासूनच श्रीकांत शिंदे हे आघाडीवर दिसत आहेत.
नारायण राणे 45 हजार मतांनी आघाडीवर आहेत. सुरूवातीच्या फेऱ्या सोडल्या तर नारायण राणे हे आघाडीवरच दिसत आहेत. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
चंद्रकांत खैरे मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले आहेत. 60 हजार मतांनी पिछाडीवर असल्याने अखेर सोडले मतदान केंद्र.
14 व्या फेरी अखेर विशाल पाटील 60 हजार मतांनी आघाडीवर. विशाल पाटील – 3 लाख 63 हजार 392. संजयकाका पाटील 3 लाख 2 हजार 618 मते
नांदेडमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळत आहे. नांदेडमध्ये वसंत चव्हाण हे आघाडीवर आहेत. काही वेळातच नांदेडचे चित्र स्पष्ट होईल.
जळगावच्या भाजपाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला जातोय. जळगावमधून महायुतीचे उमेदवार आघाडीवर. स्मिता वाघ रक्षा खडसे एक लाखाच्या मताधिक्यांनी पुढे. भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या तालावर गुलाल उधळत ठेका धरला..
बीडच्या लोकसभा निवडणुकीची मतदान मोजणी सुरू आहे. पंकजा मुंडे या पिछाडीवर गेल्या असून बजरंग सोनवणे हे आघाडीवर आहेत. बीडचे चित्र अजून स्पष्ट होऊ शकले नाहीये.
गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू आहे. काँग्रेस डॉ. नामदेव कीरसान- 227843, भाजपा अशोक नेते- 189296, काँग्रेसचे डॉ.नामदेव कीरसान 38547 आघाडीवर आहेत.
सुनील तटकरे हे आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे त्यांनी 45 हजारांची लीड मिळाली आहे. ही निवडणूक अटीतटीची होताना देखील दिसत आहे.
तीन विधानसभेच्या चार ईव्हीएम मशीनमध्ये झाला तांत्रिक बिघाड झाला आहे. आकडेवारी दाखवत नसल्याने व्हीव्हीपॅड मधील मतपत्रिका मोजल्या जाणार आहेत.
बारामतीची निवडणूक सर्वाधिक चर्चेची ठरलीये. आता या निकालाचे आकडे पुढे येताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे या तब्बल 45 हजार मतांनी पुढे आहेत.
बीड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेमध्ये लढत सुरू आहे. सर्वांच्या या निकालाकडे नजरा लागल्या आहेत.
नगरमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळत आहे. निलेश लंके हे आघाडीवर दिसत आहेत. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे बघायला मिळत आहे.
तब्बल 56 हजार मतांनी चंद्रकांत खैरे पिछाडीवर आहेत. हा अत्यंत मोठा धक्का नक्कीच म्हणावा लागणार आहे. संदीपान भुमरे 18 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
8 व्या फेरीस अखेरीस धैर्यशील मोहिते-पाटील यांना 27 हजार 63 मतांनी आघाडीवर मिळाली आहे. या निवडणूकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संजय जाधव सुरूवातीपासूनच आघाडीवर दिसत आहेत. विशेष म्हणजे नवव्या फेरीतही संजय जाधव हे आघाडीवर आहेत. महादेव जानकर यांना हा मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे.
रावेर लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. रक्षा खडसे (महायुती) – 183968,
श्रीराम पाटील (महाविकास आघाडी) – 110283, रक्षा खडसे या 73 हजार 685 मतांनी आघाडीवर आहेत.
भाजपाचे मुरलीधर मोहोळ 45 हजारांनी आघाडीवर आहेत. पुण्यातील या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत.
अनिल देसाई यांना आता 25 हजारांचे लीड मिळाल्याचे बघायला मिळत आहे. लोकसभेच्या निवडणूकीची मतदान मोजणी सुरू आहे. राहुल शेवाळेंचे वाटले टेन्शन
नवव्या फेरीमध्येही श्रीरंग बारणे हे आघाडीवर आहेत. श्रीरंग बारणे (महायुती) – 272341, संजोग वाघेरे (महाविकास आघाडी) – 231469, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 40,872 मतांनी आघाडीवर आहेत.
नांदेडमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळत आहे. आठवी फेरी सुरू असून संत चव्हाण 13500 मतांनी आघाडीवर आहेत.
ओमराजे निंबाळकर यांनी पार केला आठव्या फेरीत 1 लाख 511 मतांच्या फरकाचा टप्पा. आठवी फेरी अखेर 1 लाख 511 मतांची ओमराजे निंबाळकर यांची आघाडी.
डॉ.कल्याण काळे (काँग्रेस ) 76731, रावसाहेब दानवे (भाजपा ) 70582, काँग्रेसचे डॉ कल्याण काळे 6149 आघाडीवर आहे. भाजवाचे रावसाहेब दानवे यांना धक्का
आठव्या फेरीत पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. लीड पंकजा मुंडे यांना मिळाली आहे. पंकजा मुंडे विरूद्ध बजरंग सोनवणे अशी लढत बघायला मिळत आहे.
संजय देशमुख 1 लाख 94 हजार 877, राजश्री पाटील- 1,64,036, संजय देशमुख 30 हजार 841 लीडवर आहेत.
मावळ लोकसभा निवडणूकीची सातवी फेरी सुरू आहे. श्रीरंग बारणे (महायुती) -220016,
संजोग वाघेरे (महाविकास आघाडी) – 175327, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 44,689 मतांनी आघाडीवर आहेत.