AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC मध्ये एक कोटी जिंकलेली कोल्हापूरच्या कविता चावलांसाठी 7.5 कोटींचा प्रश्न?

या शोमध्ये मिळालेल्या पैशातून त्या त्यांचा मुलगा विवेकच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहेत. आपल्या मुलाने परदेशात शिक्षण घेऊन देशाचे नाव रोशन करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

KBC मध्ये एक कोटी जिंकलेली कोल्हापूरच्या कविता चावलांसाठी 7.5 कोटींचा प्रश्न?
KBC , Kavita chawla Image Credit source: Tv9
| Updated on: Sep 20, 2022 | 10:58 AM
Share

सोनी टीव्हवरील प्रसिद्ध क्विझ रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati -14)ला सद्या चांगलाच चर्चेत आहे. 14  व्या सिझनमधील या ‘शो’ला पहिला करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरात राहणाऱ्या कविता चावला (Kavita Chawla)यांनी एक कोटी रुपयांवर आपले नाव कोरले आहे. मात्र, आता शोची ही करोडपती महिला स्पर्धक एक कोटीच्या पुढच्या भागात म्हणजेच 7.5 कोटी रुपयांसाठी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांनी विचारलेल्या प्रश्नाला योग्य उत्तर देते की 1 कोटी रुपये घेऊन शो सोडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत कविता चावला

केबीसीमध्ये एका कोटी जिंकणाऱ्या कोल्हापूरची कविता चावला या गृहिणी आहेत. त्यांनी स्वतः त्यांचा मुलगा विवेक याला पहिली ते आठवीपर्यंत शिकवले आहे. आपल्या मुलाला शिकवताना त्यांनी स्वतः कौन बनेगा करोडपतीची तयारी केली. त्यांच्या जिद्दीने आणि आवडीने त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर आणले. या शोमध्ये मिळालेल्या पैशातून त्या त्यांचा मुलगा विवेकच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहेत. आपल्या मुलाने परदेशात शिक्षण घेऊन देशाचे नाव रोशन करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

जिंकण्याचा आत्मविश्वास

तिसर्‍यांदा नशिबाने तिला संधी दिली तेव्हा कविताने ठरवले होते की ती एक कोटी रुपये जिंकल्यावरच या शोमधून जाणार आणि म्हणून हॉटसीटवर बसल्यावर त्यांनी  जाहीर केले की त्या एक कोटी रुपये जिंकणार आहेत. त्यांचा आत्मविश्वास पाहून अमिताभ बच्चनही थक्क झाले. या शोमध्ये मुलगा विवेक व कुटुंबीयही त्यांच्या सोबत उपस्थित असलेले दिसून आले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.